शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

धोकादायक पुलामुळे नागरिकांचा जीव टांगणीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:25 IST

बाजारसावंगी : बाजारसावंगी- माटरगांव ते सुलतानपूर या मार्गावरील गिरीजा नदीवर असलेल्या पुलाची दुरावस्ता झाली आहे. पंधरावर्षांपुर्वी पुलाची उभारणी ...

बाजारसावंगी : बाजारसावंगी- माटरगांव ते सुलतानपूर या मार्गावरील गिरीजा नदीवर असलेल्या पुलाची दुरावस्ता झाली आहे. पंधरावर्षांपुर्वी पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, काही वर्षांमध्ये त्याची वाट लागली आहे. जागोजागी ख़ड्डे असून अपघात होण्याची भिती निर्माण झाली आहे. अनेक वेळा नागरिकांनी दुरुस्तीची मागणी करुनही बांधकाम दुर्लक्ष करीत आहेत.

गिरिजा मध्यम प्रकल्पाचे पाणी सध्या पुलाच्या खालोखाल आहे. या पुलास कठडे नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली गेली आहे. या पुलावरील स्लबला जागोजागी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी गज बाहेर आलेले आहेत. वाहने पुलावरून जाताना पुल हलत असल्याचे वाहधारकांना जाणवते. त्यामुळे येथे मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अभियंत्यांना या बाबतीत विचारणा केली. त्यांनीही हा पुल आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले. परिणामी हा पुलाचा नेमका वाली कोण आहे. एकाद्या दिवशी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासन झोपेतून जागे होणार आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

रस्तेही खराब

बाजारसावंगी, दरेगांव, पाडळी, लोणी बोडखा, कनकशिळ, ताजनापुर येथील नागरिकांना खडतर रस्त्याचा सामना करावा लागत आहे. त्यात गिरीजा नदीवरील धोकादायक पुलामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे त्वरीत दुरुस्तीचे कामे करण्यात यावी, अशी मागणी गणेश चव्हाण, शेख मकसुद यांनी केली आहे.

फोटो - अशाप्रकारे माटरगांव येथील गिरीजा नदीवरील पुलाची दुरावस्ता झाली असून कठडे नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झालेला आहे.