शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘दलितवस्ती’ समाज कल्याणकडे

By admin | Updated: March 15, 2016 01:07 IST

गजानन वानखडे , जालना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे

गजानन वानखडे , जालनाजिल्हा परिषद समाजकल्याण विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (पूर्वीचे नाव दलितवस्ती सुधार योजना) सुधार योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार आत्ता समाजकल्याण विभागाला देण्यात आले आहेत.शासनाच्या २७ मे २०१५ च्या शासन निर्णयामुळे समाजकल्याण विषय समिती की सर्वसाधारण सभा यामध्ये आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देईल असा संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत विषयसमिती सदस्यांनी याबाबत अनेक तक्रारी समाज कल्याण विभागाकडे केल्या होत्या. यावर तोडगा म्हणून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी ८ मार्च रोजी शुध्दीपत्रक काढून दलित वस्तीचे आलेले प्रस्ताव मार्गी लावण्याचे अधिकारी आत्ता जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. २०१५ -१६ या वर्षासाठी जिल्ह्याला दलितवस्ती सुधार योजनेसाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून दलितवस्ती विकास योजनेची अनेक कामे ठप्प आहेत. ५ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तावांना मंजुरी देण्याचे काम अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात होते. मात्र, २७ मे २०१५ रोजीच्या शासनाच्या निर्णयाव्दारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकारी काढून ते जिल्हा परिषदेला देण्यात आले. परंतु समाजकल्याण विभागाची विषय समिती आणि सर्वसाधारण सभा यांच्यात विविध प्रस्तावांबाबत एकमत होत नसल्याने अनेक गावांच्या विकास कामांना मंजुरीच मिळत नव्हती. सर्वसाधारण सभा आणि विषयसमितीच्या अध्यक्ष सदस्यांनी शिफारस केलेल्या गावांचा विकास रखडलेला आहे. याबाबत समाकल्याण मंत्र्यापर्यंत तक्रारी गेल्याने समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी याबाबत ८ मार्च रोजी शुध्दीपत्रक काढून यासंबधी जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेसंदर्भात आलेल्या प्रस्तावांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्रस्ताव मार्गी लावण्याचे अधिकार दिले आहेत. या योजनेअंतर्गत आराखड्यानुसार दलितवस्ती मध्ये पिण्याचे पाणी, नाल्या तयार करणे, विद्युतीकरण करणे, सिमेंट रस्ते तयार करणे आदी विकास कामांसाठी समाजकल्याण विभागाला शासनाकडून २२ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. सध्या जिल्ह्यातून समाजकल्याण विभागाकडे ११०० प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार नियोजन सुरू करण्यात आले असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाला हे अधिकार देण्यात आल्याने जिल्ह्यातील रखडलेली दलित वस्तीची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.शासनाच्या २७ मे २०१५ च्या शासन निर्णयामुळे समाजकल्याण विषय समिती की सर्वसाधारण सभा यामध्ये आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देईल, असा संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत विषयसमिती सदस्यांनी अनेक तक्रारी समाज कल्याण विभागाकडे केल्या होत्या. यावर तोडगा म्हणून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी ८ मार्च रोजी हे शुध्दीपत्रक काढले आहे.शासनाने दलितवस्तीसुधार योजनेच्या प्रस्तावाचे अधिकार जरी समाजकल्याण विभागाला दिले तरी विभागप्रमुख म्हणून या समाज कल्याणच्या निर्णयावर आपले नियंत्रण असणार आहे. शासनाच्या निर्णयानुसारच विविध कामांना मंजुरी देण्यात येईल. शासनाने नुकतेच जारी केलेल्या शुध्दीपत्रकाचा अभ्यास करून त्यानुसार निर्णय घेण्यात येणार येतील, असे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.