शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘दलितवस्ती’ समाज कल्याणकडे

By admin | Updated: March 15, 2016 01:07 IST

गजानन वानखडे , जालना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे

गजानन वानखडे , जालनाजिल्हा परिषद समाजकल्याण विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे (पूर्वीचे नाव दलितवस्ती सुधार योजना) सुधार योजनेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार आत्ता समाजकल्याण विभागाला देण्यात आले आहेत.शासनाच्या २७ मे २०१५ च्या शासन निर्णयामुळे समाजकल्याण विषय समिती की सर्वसाधारण सभा यामध्ये आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देईल असा संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत विषयसमिती सदस्यांनी याबाबत अनेक तक्रारी समाज कल्याण विभागाकडे केल्या होत्या. यावर तोडगा म्हणून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी ८ मार्च रोजी शुध्दीपत्रक काढून दलित वस्तीचे आलेले प्रस्ताव मार्गी लावण्याचे अधिकारी आत्ता जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. २०१५ -१६ या वर्षासाठी जिल्ह्याला दलितवस्ती सुधार योजनेसाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यात मागील दीड वर्षापासून दलितवस्ती विकास योजनेची अनेक कामे ठप्प आहेत. ५ डिसेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तावांना मंजुरी देण्याचे काम अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या अधिकार क्षेत्रात होते. मात्र, २७ मे २०१५ रोजीच्या शासनाच्या निर्णयाव्दारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अधिकारी काढून ते जिल्हा परिषदेला देण्यात आले. परंतु समाजकल्याण विभागाची विषय समिती आणि सर्वसाधारण सभा यांच्यात विविध प्रस्तावांबाबत एकमत होत नसल्याने अनेक गावांच्या विकास कामांना मंजुरीच मिळत नव्हती. सर्वसाधारण सभा आणि विषयसमितीच्या अध्यक्ष सदस्यांनी शिफारस केलेल्या गावांचा विकास रखडलेला आहे. याबाबत समाकल्याण मंत्र्यापर्यंत तक्रारी गेल्याने समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी याबाबत ८ मार्च रोजी शुध्दीपत्रक काढून यासंबधी जिल्ह्यातील दलितवस्ती सुधार योजनेसंदर्भात आलेल्या प्रस्तावांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला प्रस्ताव मार्गी लावण्याचे अधिकार दिले आहेत. या योजनेअंतर्गत आराखड्यानुसार दलितवस्ती मध्ये पिण्याचे पाणी, नाल्या तयार करणे, विद्युतीकरण करणे, सिमेंट रस्ते तयार करणे आदी विकास कामांसाठी समाजकल्याण विभागाला शासनाकडून २२ कोटी रूपये निधी मंजूर झाला आहे. सध्या जिल्ह्यातून समाजकल्याण विभागाकडे ११०० प्रस्ताव आले आहेत. त्यानुसार नियोजन सुरू करण्यात आले असल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. समाज कल्याण विभागाला हे अधिकार देण्यात आल्याने जिल्ह्यातील रखडलेली दलित वस्तीची कामे मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.शासनाच्या २७ मे २०१५ च्या शासन निर्णयामुळे समाजकल्याण विषय समिती की सर्वसाधारण सभा यामध्ये आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देईल, असा संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत विषयसमिती सदस्यांनी अनेक तक्रारी समाज कल्याण विभागाकडे केल्या होत्या. यावर तोडगा म्हणून समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी ८ मार्च रोजी हे शुध्दीपत्रक काढले आहे.शासनाने दलितवस्तीसुधार योजनेच्या प्रस्तावाचे अधिकार जरी समाजकल्याण विभागाला दिले तरी विभागप्रमुख म्हणून या समाज कल्याणच्या निर्णयावर आपले नियंत्रण असणार आहे. शासनाच्या निर्णयानुसारच विविध कामांना मंजुरी देण्यात येईल. शासनाने नुकतेच जारी केलेल्या शुध्दीपत्रकाचा अभ्यास करून त्यानुसार निर्णय घेण्यात येणार येतील, असे जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.