शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

दररोज ९० एमएलडी दूषित पाणी जायकवाडीत

By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST

विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे

विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे सुमारे ९० एमएलडी पाणी एसटीपीतून शुद्ध न होताच नाथसागराला मिळत असल्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. मनपाच्या ४६४ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेत ६ एसटीपी प्रस्तावित आहेत. योजनेचे काम या महिन्यात सुरू झाल्यास एसटीपी होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत शहरातील नाल्यांचे पाणी जायकवाडीला जाऊन मिळणारच आहे. तोवर जायकवाडीतील जलप्रदूषण वाढेल. शहरात सध्या दोन एसटीपी आहेत. त्याचा जायकवाडीशी संबंध नाही. शहरातून दररोज ७० ते ९० एमएलडी पाणी नाल्यातून वाहते. तेच पाणी ब्रह्मगव्हाणमार्गे जायकवाडीत येऊन मिळते. डाव्या कालव्याच्या बाजूने उतार असल्यामुळे पालिकेच्या उपसा केंद्रातून दूषित पाणी फारोळ्याकडे येते. ब्रह्मगव्हाण येथे एमआयडीसीचे उपसा केंद्र होते. त्यांनी ते केंद्र पुढे सरकवले आहे. त्यामुळे शहरातील नाल्याचे पाणी थेट जायकवाडीत येत आहे. एसटीपीतून फिल्टर होऊन ते पाणी जायकवाडीत येणे क्रमप्राप्त आहे. मनपाचे अभियंते म्हणतात १ किलो लिटर प्रती एमएलडी क्लोरिनचे प्रमाण सध्या पाण्यात टाकण्यात येत आहे. मध्यंतरी पाण्यात अळ्या व इतर कीटकांचे प्रमाण वाढलेले दिसून आले होते. जायकवाडीतून येणारे पाणी दूषित असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. मध्यंतरी शुद्धीकरण केंद्रात कीटक वाढले होते. रसायनांचा वापर वाढविल्यानंतर कीटक नष्ट झाले, असे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. जलप्रदूषण वाढल्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च २० लाखांहून १ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रदूषणामुळे कीटकांचे प्रमाण वाढल्यास खर्च वाढतो. तुरटी, ब्लिचिंग पावडर, क्लोरिन टाकून फारोळा येथे जायकवाडीतून येणारे पाणी शुद्ध करून नक्षत्रवाडी संतुलन टाकीतून शहराकडे येते. शुद्धीकरण खर्च १ कोटी फारोळा येथे जायकवाडीतून येणार्‍या पाण्याचे टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह सॉलिड) २५० पर्यंत असते. क्लोरिन व इतर रसायनांचा मारा करून ते पाण्याचे टीडीएस २०० ते १७५ पर्यंत आणले जाते. जलगुणवत्ता प्रयोगशाळेच्या अहवालानुसार रसायनांचे प्रमाण ठरते.