शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

दररोज ९० एमएलडी दूषित पाणी जायकवाडीत

By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST

विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे

विकास राऊत, औरंगाबाद जायकवाडीचे पाणी दूषित होण्याचे प्रमाण मागील १० वर्षांच्या तुलनेत दुपटीने वाढले आहे. शहरातील ६६ कि़ मी. नाल्यातून वाहणारे सुमारे ९० एमएलडी पाणी एसटीपीतून शुद्ध न होताच नाथसागराला मिळत असल्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. मनपाच्या ४६४ कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेत ६ एसटीपी प्रस्तावित आहेत. योजनेचे काम या महिन्यात सुरू झाल्यास एसटीपी होण्यास ३ वर्षे लागतील. तोपर्यंत शहरातील नाल्यांचे पाणी जायकवाडीला जाऊन मिळणारच आहे. तोवर जायकवाडीतील जलप्रदूषण वाढेल. शहरात सध्या दोन एसटीपी आहेत. त्याचा जायकवाडीशी संबंध नाही. शहरातून दररोज ७० ते ९० एमएलडी पाणी नाल्यातून वाहते. तेच पाणी ब्रह्मगव्हाणमार्गे जायकवाडीत येऊन मिळते. डाव्या कालव्याच्या बाजूने उतार असल्यामुळे पालिकेच्या उपसा केंद्रातून दूषित पाणी फारोळ्याकडे येते. ब्रह्मगव्हाण येथे एमआयडीसीचे उपसा केंद्र होते. त्यांनी ते केंद्र पुढे सरकवले आहे. त्यामुळे शहरातील नाल्याचे पाणी थेट जायकवाडीत येत आहे. एसटीपीतून फिल्टर होऊन ते पाणी जायकवाडीत येणे क्रमप्राप्त आहे. मनपाचे अभियंते म्हणतात १ किलो लिटर प्रती एमएलडी क्लोरिनचे प्रमाण सध्या पाण्यात टाकण्यात येत आहे. मध्यंतरी पाण्यात अळ्या व इतर कीटकांचे प्रमाण वाढलेले दिसून आले होते. जायकवाडीतून येणारे पाणी दूषित असल्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. मध्यंतरी शुद्धीकरण केंद्रात कीटक वाढले होते. रसायनांचा वापर वाढविल्यानंतर कीटक नष्ट झाले, असे उपअभियंता के. एम. फालक यांनी सांगितले. जलप्रदूषण वाढल्यामुळे शुद्धीकरणाचा खर्च २० लाखांहून १ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. प्रदूषणामुळे कीटकांचे प्रमाण वाढल्यास खर्च वाढतो. तुरटी, ब्लिचिंग पावडर, क्लोरिन टाकून फारोळा येथे जायकवाडीतून येणारे पाणी शुद्ध करून नक्षत्रवाडी संतुलन टाकीतून शहराकडे येते. शुद्धीकरण खर्च १ कोटी फारोळा येथे जायकवाडीतून येणार्‍या पाण्याचे टीडीएस (टोटल डिझॉल्व्ह सॉलिड) २५० पर्यंत असते. क्लोरिन व इतर रसायनांचा मारा करून ते पाण्याचे टीडीएस २०० ते १७५ पर्यंत आणले जाते. जलगुणवत्ता प्रयोगशाळेच्या अहवालानुसार रसायनांचे प्रमाण ठरते.