औरंगाबाद : कडाक्याच्या थंडीने औरंगाबाद त्रस्त असताना सोमवारी फारोळा येथे व्हॉल्व्ह निखळला. त्यामुळे मंगळवारी शहरात ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता, त्यांना पाणी मिळाले नाही. दिवसभर नागरिक पाण्यासाठी व्याकूळ झाले होते. आज दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी पुढील तीन दिवस शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.महापालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा कालबाह्य झाली असून, संपूर्ण नवीन यंत्रणा उभी करेपर्यंत जुन्या योजनांवरच शहराची भिस्त आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून पाणीपुरवठा खाजगी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. कंपनीकडून समाधानकारक पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड रोजच सुरू असताना सोमवारी फारोळा येथील व्हॉल्व्ह निखळला. त्यासोबतच एका ठिकाणी जलवाहिनीची डागडुजीही करण्यात आली. या सर्व प्रक्रियेला २४ तास लागले.आज दुपारी ३ वाजता दुरुस्तीचे काम संपले. सायंकाळी सहा वाजता शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. उद्या सकाळपासून पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतीयाळे यांनी सांगितले.पाण्याच्या टाक्या कोरड्यादरम्यान, मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा करायचा होता, त्या वसाहतींना पाणी जाऊ शकले नाही. शहरातील मोठ्या टाक्यांमध्ये पाणी नसल्याने पाण्याचे टँकरही बंद होते. दिवसभर नागरिक पाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. समांतर जलवाहिनीच्या कंत्राटदाराने नागरिकांना पाणी येणार नसल्याची कोणतीही सूचना दिली नव्हती. अनेक वॉर्डात नागरिकांनी नगरसेवकांना धारेवर धरले. नगरसेवकांनी आज पाणी येणार नसल्याचे सांगितले.
थंडीतही पाण्याची ओरड
By admin | Updated: December 24, 2014 01:04 IST