शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

अनलाॅकमुळे रेल्वे, बसमध्ये प्रवाशांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रवासी वाहतूक परवानगीविना खोळंबली होती. आता कोरोनाचा आलेख कमी झाल्याने अनलाॅकचा निर्णय घेण्यात ...

औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे प्रवासी वाहतूक परवानगीविना खोळंबली होती. आता कोरोनाचा आलेख कमी झाल्याने अनलाॅकचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सध्या रेल्वे आणि बसमध्ये प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येत आहे.

शहरातून पहिल्या दिवशी १८५ बस प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आलेल्या आहेत. या बसमधून जवळपास पाच हजारांवर प्रवासी प्रवास करत आहेत. बहुतांश प्रवासी मास्क, सॅनिटायझरचा वापर करीत आहेत. दोन दिवसांपासून रेल्वेस्थानकावरही प्रवासी वाढले आहेत. नंदिग्राम व शताब्दी या दोन रेल्वे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. सध्या औरंगाबाद स्थानकावर सतरा गाड्यांचे अपडाऊन सुरू आहे. दररोज अडीच हजारांच्या जवळपास प्रवासी प्रवास करीत आहेत. कोरोनाकाळात हाताला काम नसल्यामुळे अनेक कामगार गावाकडे गेले होते, ते पुन्हा कामावर परतत आहेत. विवाह समारंभ तसेच विविध कार्यक्रमांसाठी नागरिकांचा जिल्हा व जिल्ह्याबाहेर प्रवास सुरू आहे. सध्या रेल्वेचे बुकिंग केवळ ऑनलाइन केले जात आहे. प्रवाशांची तपासणी करण्यावर देखील भर दिला जात आहे. खबरदारी बाळगली नाही तर तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवल्यामुळे अनेक जण स्वतःला सुरक्षित प्रवास कसा करता येईल, यादृष्टीने काळजी घेत आहेत.

अत्यावश्यक कामासाठी प्रवास...

सर्व खबरदारी घेत रेल्वे गाड्या सुरू आहेत. प्रवासासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू आहे. तिकीट खिडकी सुरू करण्यात आली नाही. पूर्वीपेक्षा प्रवासी संख्येत वाढ झालेली आहे. मुंबईकडे जाणाऱ्या - येणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. दोन गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

_रेल्वे अधिकारी.

बस निर्जंतुकीकरण केले जाते, प्रवाशांनाही मास्कशिवाय प्रवेश दिला जात नाही. प्रवासी संख्या वाढलेली आहे. १८५ बस सोमवारी सोडलेल्या आहेत. कामगार प्रवासी बसस्थानकावर येत आहे.

-अरुण सिया (एसटी विभाग नियंत्रक)

दोन महिन्यांनंतर महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागत आहे. नातेवाइकाचा विवाह असल्यामुळे बसने प्रवास करावयाचा आहे. पूर्वी पास काढल्याशिवाय जाता येत नव्हते, आता ते सहज शक्य झाले आहे.

-अण्णासाहेब पाखरे, प्रवासी

कामानिमित्त बाहेरगावी जात आहे आहे. काम बंद होते त्यामुळे गावाकडे आलो होतो. आता परत कामासाठी बाहेरगावी जायचे आहे.

- नंदू आराक (रेल्वे प्रवासी)

बसच्या फेऱ्या

१८५

प्रवासी

५०००

धावणाऱ्या रेल्वे

१७

प्रवासी

२५००

मुंबईला जाणारे अधिक...

मुंबईकडे प्रवासाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून, रेल्वेस्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ वाढलेली दिसत आहे. जिल्ह्यासह जवळच्या तालुक्यात जाणाऱ्या बससाठी प्रवासी गर्दी करीत आहेत. कामानिमित्त कामगार औद्योगिक क्षेत्रात येत आहेत. यांची संख्या बऱ्यापैकी दिसत आहे.

(793 डमी)