शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
2
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
3
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
4
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
5
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
6
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
7
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
8
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
11
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
12
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
13
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
14
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
15
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
16
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
17
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
18
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
19
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!

जायकवाडी लाभक्षेत्रातील पिके ‘सलाइन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:43 IST

पैठण : गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

संजय जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत नसल्याचे कारण पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून पुढे करण्यात येत आहे. दुसरीकडे लाखो हेक्टरमधील शेतकरी जायकवाडीतून पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत. पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील १,८३,३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. जायकवाडी धरणात जलसाठा उपलब्ध असल्याने खरीप पिकासाठी एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते; परंतु दुसरीकडे पाणी न मिळाल्यास लाभक्षेत्रातील लाखो एकरमधील खरिपाची पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मुळा, भंडारदरा व दारणा धरणांतून कालव्याद्वारे सिंचनासाठी आवर्तन देण्यात आल्याने तेथील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत मात्र मोठी नाराजी आहे. पाणी न मिळाल्यास त्याचा फटका जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या १ लाख ८३ हजार हेक्टरमधील खरिपाच्या पिकास बसण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसावर लाभक्षेत्रातील लाखो हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; पण गेल्या २० दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने बाळसे धरलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची तगमग वाढीस लागली असून, शेतातील पिकासाठी धरणातून पाणी सोडा, अशी मागणी ते करीत आहेत.जायकवाडीच्या २०८ कि.मी. लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १,४१,६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यात औरंगाबाद- ७,६२० हे., जालना- ३६,५८० हे., परभणी- ९७,४४० हेक्टर क्षेत्र येते. या क्षेत्रात पेरणी झालेली असून, पाण्याअभावी पिके संकटात आहेत.