शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी लाभक्षेत्रातील पिके ‘सलाइन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2017 00:43 IST

पैठण : गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे.

संजय जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : गेल्या २० ते २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने संकटात सापडलेल्या पिकांसाठी जायकवाडी धरणातून खरीप संरक्षित पाळी सोडण्यात यावी, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. जायकवाडी धरणात असलेला उपलब्ध साठा व खरीप संरक्षित पाळीसाठी लागणारे पाणी याचा मेळ बसत नसल्याचे कारण पाणी सोडण्यासाठी प्रशासनाकडून पुढे करण्यात येत आहे. दुसरीकडे लाखो हेक्टरमधील शेतकरी जायकवाडीतून पाणी सोडा, अशी मागणी करीत आहेत. पैठण तालुक्यातील व जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या ३८६ गावांतील १,८३,३२२ हेक्टरमधील खरीप पिकांना पाण्याची गरज असून, पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. जायकवाडी धरणात जलसाठा उपलब्ध असल्याने खरीप पिकासाठी एक आवर्तन सोडण्यात यावे, अशी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन खरिपासाठी संरक्षित पाळी धरणातून देता येते; परंतु दुसरीकडे पाणी न मिळाल्यास लाभक्षेत्रातील लाखो एकरमधील खरिपाची पिके हातातून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील मुळा, भंडारदरा व दारणा धरणांतून कालव्याद्वारे सिंचनासाठी आवर्तन देण्यात आल्याने तेथील शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांत मात्र मोठी नाराजी आहे. पाणी न मिळाल्यास त्याचा फटका जायकवाडीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या १ लाख ८३ हजार हेक्टरमधील खरिपाच्या पिकास बसण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसावर लाभक्षेत्रातील लाखो हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; पण गेल्या २० दिवसांपासून पावसाने अचानक दडी मारल्याने बाळसे धरलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांची तगमग वाढीस लागली असून, शेतातील पिकासाठी धरणातून पाणी सोडा, अशी मागणी ते करीत आहेत.जायकवाडीच्या २०८ कि.मी. लांबी असलेल्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात १,४१,६४० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यात औरंगाबाद- ७,६२० हे., जालना- ३६,५८० हे., परभणी- ९७,४४० हेक्टर क्षेत्र येते. या क्षेत्रात पेरणी झालेली असून, पाण्याअभावी पिके संकटात आहेत.