शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

पिके कोमेजू लागली; पाणीटंचाई ‘जैसे थे’

By admin | Updated: August 4, 2014 01:57 IST

सिल्लोड : तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची उगवलेली पिके कोमेजू लागली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे

सिल्लोड : तालुक्यात आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाची उगवलेली पिके कोमेजू लागली असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.यंदा पावसाचे दीड महिना उशिरा आगमन होऊनही अद्यापपर्यंत तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. तालुक्यात मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. कपाशी, मका, सोयाबीन, बाजरी आदी पिके उगवत असताना आठ-दहा दिवसांपूर्वी तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस झाला. यामुळे उगवणी होत असलेल्या पिकांसाठी रिमझिम पाऊस फलदायी ठरला. रिमझिम पावसामुळे पिके चांगली उगवली; परंतु गेल्या आठ-दहा दिवसांपासून तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने उगवलेली पिके कोमेजू लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे असून बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळा सुरू दोन महिने झाले तरी अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने जलसाठे कोरडेच असून विहिरींना पाणी नाही. तालुक्यात काही गावांमध्ये मे महिन्यापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तालुक्यातील २२ गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे. सलग तीन वर्षांपासून वरुणराजाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. रबीची पिके ऐन सोंगणीत असताना तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. हातातोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावला गेला. यंदा पावसाचे दीड महिना उशिरा आगमन झाले. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे आहेत.