शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयाचेही पीक नियोजन ‘फेल’

By admin | Updated: January 30, 2016 00:42 IST

राजेश खराडे ,बीड शेतकऱ्यांकरिता बियाणे उपलब्ध व्हावे, तसेच कृषी कार्यालयातील शेत परिसरातून शेतकऱ्यांना विविध गोष्टींवर मार्गदर्शन व्हावे याकरिता जिल्हा कृषी कार्यालयाच्या सुमारे

राजेश खराडे ,बीडशेतकऱ्यांकरिता बियाणे उपलब्ध व्हावे, तसेच कृषी कार्यालयातील शेत परिसरातून शेतकऱ्यांना विविध गोष्टींवर मार्गदर्शन व्हावे याकरिता जिल्हा कृषी कार्यालयाच्या सुमारे २० एकरावर पिकांची लागवड करण्यात आली होती; मात्र पावसाअभावी यंदाच्या रबी व खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढवावे याकरिता जिल्हा अधीक्षक कार्यालयातील शेतजमिनीवर वेगवेगळे प्रयोग केले जात असत. यातूनच येथे मार्गदर्शन केंद्रही उभारण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस घटते उत्पादन व सर्कलच्या ठिकाणीच मार्गदर्शन केंद्र उभारल्याने येथील केंद्रमाला उतरती कळा लागली आहे.सद्य:स्थितीला शेतजमिनीवर पिकांची लागवड व लगतच रोपवाटिका उभारली आहे. येथील उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले बी-बियाणे मिळून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. उर्वरित उत्पादन हे महाबीज कंपनीकडे विक्री केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून सबंध जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच संबंधित अधिकाऱ्यांकडून या जमिनीवर प्रयोग राबविण्याबाबत उदासीनता असल्याने यंदा खरीपाच्या हंगामात एकही पीक पदरी पडले नाही. शिवाय रबी हंगामात ज्वारी पाच एकरात, करडई साडेसात एकरात, तर चारापीक म्हणून मक्याची लागवड पाच एकरात करण्यात आली होती. येथील उत्पादनावर वेगवेगळे प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्शवत उदाहरण ठेवणे अपेक्षित होते; मात्र लागवडीपासूनच सबंध पिके धोक्यात होती. ज्वारीची तर वाढ खुंटल्याने बाटुकाअवस्थेतच काढणीला सुरुवात झाली होती. मका आणि करडईमधून अपेक्षित असे उत्पादन हाती लागले नाही. उलटअर्थी, उत्पादनापेक्षा अधिक खर्च कामगारावर झाला आहे.