शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

कृषी कार्यालयाचेही पीक नियोजन ‘फेल’

By admin | Updated: January 30, 2016 00:42 IST

राजेश खराडे ,बीड शेतकऱ्यांकरिता बियाणे उपलब्ध व्हावे, तसेच कृषी कार्यालयातील शेत परिसरातून शेतकऱ्यांना विविध गोष्टींवर मार्गदर्शन व्हावे याकरिता जिल्हा कृषी कार्यालयाच्या सुमारे

राजेश खराडे ,बीडशेतकऱ्यांकरिता बियाणे उपलब्ध व्हावे, तसेच कृषी कार्यालयातील शेत परिसरातून शेतकऱ्यांना विविध गोष्टींवर मार्गदर्शन व्हावे याकरिता जिल्हा कृषी कार्यालयाच्या सुमारे २० एकरावर पिकांची लागवड करण्यात आली होती; मात्र पावसाअभावी यंदाच्या रबी व खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले.शेतकऱ्यांनी अत्याधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादन वाढवावे याकरिता जिल्हा अधीक्षक कार्यालयातील शेतजमिनीवर वेगवेगळे प्रयोग केले जात असत. यातूनच येथे मार्गदर्शन केंद्रही उभारण्यात आले होते. मात्र दिवसेंदिवस घटते उत्पादन व सर्कलच्या ठिकाणीच मार्गदर्शन केंद्र उभारल्याने येथील केंद्रमाला उतरती कळा लागली आहे.सद्य:स्थितीला शेतजमिनीवर पिकांची लागवड व लगतच रोपवाटिका उभारली आहे. येथील उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले बी-बियाणे मिळून देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. उर्वरित उत्पादन हे महाबीज कंपनीकडे विक्री केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून सबंध जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच संबंधित अधिकाऱ्यांकडून या जमिनीवर प्रयोग राबविण्याबाबत उदासीनता असल्याने यंदा खरीपाच्या हंगामात एकही पीक पदरी पडले नाही. शिवाय रबी हंगामात ज्वारी पाच एकरात, करडई साडेसात एकरात, तर चारापीक म्हणून मक्याची लागवड पाच एकरात करण्यात आली होती. येथील उत्पादनावर वेगवेगळे प्रयोग करून शेतकऱ्यांसमोर एक आदर्शवत उदाहरण ठेवणे अपेक्षित होते; मात्र लागवडीपासूनच सबंध पिके धोक्यात होती. ज्वारीची तर वाढ खुंटल्याने बाटुकाअवस्थेतच काढणीला सुरुवात झाली होती. मका आणि करडईमधून अपेक्षित असे उत्पादन हाती लागले नाही. उलटअर्थी, उत्पादनापेक्षा अधिक खर्च कामगारावर झाला आहे.