शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप कासवगतीनेच

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

जालना : १५ जूनपूर्वीच शंभर टक्के पीक कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतरही बँकांनी केवळ ३३ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप केले आहे.

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपूर्वीच शंभर टक्के पीक कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतरही विविध बँकांनी अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप केले आहे. एकीकडे वरूणराजा रूसला असून दुसरीकडे विविध बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमधून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वितरण होणे आवश्यक आहे. मात्र बँकांकडून ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत आहे. २० जूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकारी बँकेतर्फे १५५ कोटी ५८ लाख, खाजगी बँक १५ कोटी ४६ लाख, ग्रामीण बँकेने ६५ कोटी ४० लाख, जिल्हा सहकारी बँकेने २८ कोटी ९२ लाख रूपये असे एकूण २६६ कोटी ३६ लाख रूपये पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांसह प्रशासनात मोठी खळबळ उडाली. विशेषत: जिल्ह्याधिकारी नायक यांनी दखल घेत बँकाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. कर्ज वितरणाचे काम अत्यंत संथगतीने चालू असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून बँकाच्या अधिकाऱ्यांना उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या होत्या. पालकमंत्री टोपे यांनीदेखील ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत त्यासाठी विशेष बैठक घेतली होती.जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ लाख ८४ खातेदारांनाच पीक कर्जाचे वाटप केले जाते. परंतु नवीन शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. नव्याने पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकानी पीक कर्ज देता येईल, अशा सूचना पालकमंत्री टोपे यांनी दिल्या होत्या. यावर्षी जिल्ह्यात पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट २४ टक्क्यांनी वाढवून ते ७९७ कोटी रूपयांचे करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्याने पीक कर्ज वाटपात अग्रक्रम पटकावला होता.यंदा मात्र पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस पडण्याची शेतकरीवर्ग वाट पाहत आहे आणि बी बियाणांच्या खरेदीसाठी बँकेचे खेटे मारत असून अद्यापही ३३ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्ज लवकर वाटप करावे, अशी आशा शेतकरीवर्गातून होत आहे. जेणेकरून शेतकरी पुन्हा नव्या दमाने पेरणीसाठी सज्ज होईल. (प्रतिनिधी)मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाबरोबरच बँकेकडून मिळणाऱ्या पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअगोदर कर्जाची रक्कम हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे कर्जाची रक्कम तातडीने हाती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत.