शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

जिल्ह्यात पीक कर्ज वाटप कासवगतीनेच

By admin | Updated: July 7, 2014 00:19 IST

जालना : १५ जूनपूर्वीच शंभर टक्के पीक कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतरही बँकांनी केवळ ३३ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप केले आहे.

जालना : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५ जूनपूर्वीच शंभर टक्के पीक कर्ज वाटप करण्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी आदेश दिल्यानंतरही विविध बँकांनी अद्यापपर्यंत केवळ ३३ टक्के शेतकऱ्यांनाच पीक कर्ज वाटप केले आहे. एकीकडे वरूणराजा रूसला असून दुसरीकडे विविध बँकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांमधून शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वितरण होणे आवश्यक आहे. मात्र बँकांकडून ही प्रक्रिया अत्यंत संथगतीने होत आहे. २० जूनपर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहकारी बँकेतर्फे १५५ कोटी ५८ लाख, खाजगी बँक १५ कोटी ४६ लाख, ग्रामीण बँकेने ६५ कोटी ४० लाख, जिल्हा सहकारी बँकेने २८ कोटी ९२ लाख रूपये असे एकूण २६६ कोटी ३६ लाख रूपये पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांसह प्रशासनात मोठी खळबळ उडाली. विशेषत: जिल्ह्याधिकारी नायक यांनी दखल घेत बँकाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. कर्ज वितरणाचे काम अत्यंत संथगतीने चालू असल्याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून बँकाच्या अधिकाऱ्यांना उद्दिष्ट लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या होत्या. पालकमंत्री टोपे यांनीदेखील ‘लोकमत’ च्या वृत्ताची दखल घेत त्यासाठी विशेष बैठक घेतली होती.जिल्ह्यातील सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांपैकी फक्त १ लाख ८४ खातेदारांनाच पीक कर्जाचे वाटप केले जाते. परंतु नवीन शेतकऱ्यांची पीक कर्जासाठी अडवणूक केली जाते. नव्याने पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकानी पीक कर्ज देता येईल, अशा सूचना पालकमंत्री टोपे यांनी दिल्या होत्या. यावर्षी जिल्ह्यात पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. यावर्षी पीक कर्जाचे उद्दिष्ट २४ टक्क्यांनी वाढवून ते ७९७ कोटी रूपयांचे करण्यात आले आहे. गतवर्षी जिल्ह्याने पीक कर्ज वाटपात अग्रक्रम पटकावला होता.यंदा मात्र पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पाऊस पडण्याची शेतकरीवर्ग वाट पाहत आहे आणि बी बियाणांच्या खरेदीसाठी बँकेचे खेटे मारत असून अद्यापही ३३ टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. पाऊस नसल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत झाली आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी कर्ज लवकर वाटप करावे, अशी आशा शेतकरीवर्गातून होत आहे. जेणेकरून शेतकरी पुन्हा नव्या दमाने पेरणीसाठी सज्ज होईल. (प्रतिनिधी)मान्सूनचा पाऊस जिल्ह्यात अजूनही काही ठिकाणी झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पावसाबरोबरच बँकेकडून मिळणाऱ्या पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाअगोदर कर्जाची रक्कम हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही कर्ज मिळालेले नाही. त्यामुळे कर्जाची रक्कम तातडीने हाती द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. पावसासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून आहेत.