शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे चार हजार ८०० कोटी लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून साधारणत: ५८०० कोटी ...

औरंगाबाद : राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून साधारणत: ५८०० कोटी रुपये पीक विम्याची रक्कम होत आहे. त्यापैकी आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ४८०० कोटी रुपये कंपन्यांनी लाटल्यासारखेच आहे, ही फार गंभीर गोष्ट असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते.

सोयाबीन बियाणे, युरिया खतांची मागणी असून ते कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगून कृषिमंत्री भुसे म्हणाले. प्रधानमंत्री पीक विम्याबाबत खूप तक्रारी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील तक्रारींबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचे पथक पाठवून राज्यमंत्री सत्तार यांच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मग यामध्ये महसूल, कृषी विभागाचे अधिकारी असू द्या, कुणाचीही गय केली जाणार नाही.

विमा कंपन्यांनी आजवर एक हजार कोटींची नुकसानभरपाई दिली असून, चार हजार ८०० कोटींची रक्कम कंपन्यांना मिळाली आहे. केंद्र शासनाला विम्याचे स्वरूप जाहीर करण्याबाबत मागील दहा महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. गेल्यावेळी बीड जिल्ह्यात एकही विमा कंपनी काम करण्यास तयार नव्हती. बीड जिल्ह्यात राबविलेले ८०:११० हे प्रारूप राबविण्यासाठी केंद्र शासनाला मागणी केली आहे.

पीकविमा हा अतिशय क्लिष्ट विषय आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसारच विमा कंपन्या काम करीत आहेत. पीकविमा ऐच्छिक ठेवला आहे. शेतकऱ्यांचा हिस्सा वगळल्यानंतर ३० ऐवजी ५० टक्के केंद्राने जबाबदारी ठेवावी, अशी मागणी होती. परंतु ३० टक्के प्रीमियमची जबाबदारी केंद्राने राज्य सरकारवर टाकली. केंद्र शासनाने स्वत:ची जबाबदारी झटकली आहे. यासंदर्भात ज्या ज्या पातळीवरून चौकशी करावी लागेल, त्या पद्धतीने चौकशी केली जाईल. या सगळ्या प्रकरणात खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दोषींवर कारवाई करण्यात येईल

कृषिमंत्री भुसे म्हणाले, जास्तीच्या दराने खतांची विक्री झाली आहे. जी जास्तीची रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली गेली, ती परत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. ज्यांनी जुना स्टॉक जास्त किमतीने विकला, त्याबाबत रेकॉर्डनिहाय कारवाई करण्यात येणार आहे. खतांच्या पूर्ण व्यवहारांची उलटतपासणी करण्यात येणार आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. खतांच्या किमती आणि सवलती हा काही राजकारणाचा विषय नाही.