शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे चार हजार ८०० कोटी लाटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून साधारणत: ५८०० कोटी ...

औरंगाबाद : राज्यात रब्बी व खरीप हंगामासाठी शेतकरी, राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा मिळून साधारणत: ५८०० कोटी रुपये पीक विम्याची रक्कम होत आहे. त्यापैकी आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली आहे. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ४८०० कोटी रुपये कंपन्यांनी लाटल्यासारखेच आहे, ही फार गंभीर गोष्ट असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते.

सोयाबीन बियाणे, युरिया खतांची मागणी असून ते कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जात असल्याचे सांगून कृषिमंत्री भुसे म्हणाले. प्रधानमंत्री पीक विम्याबाबत खूप तक्रारी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील तक्रारींबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचे पथक पाठवून राज्यमंत्री सत्तार यांच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, मग यामध्ये महसूल, कृषी विभागाचे अधिकारी असू द्या, कुणाचीही गय केली जाणार नाही.

विमा कंपन्यांनी आजवर एक हजार कोटींची नुकसानभरपाई दिली असून, चार हजार ८०० कोटींची रक्कम कंपन्यांना मिळाली आहे. केंद्र शासनाला विम्याचे स्वरूप जाहीर करण्याबाबत मागील दहा महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. गेल्यावेळी बीड जिल्ह्यात एकही विमा कंपनी काम करण्यास तयार नव्हती. बीड जिल्ह्यात राबविलेले ८०:११० हे प्रारूप राबविण्यासाठी केंद्र शासनाला मागणी केली आहे.

पीकविमा हा अतिशय क्लिष्ट विषय आहे. केंद्र शासनाच्या सूचनांनुसारच विमा कंपन्या काम करीत आहेत. पीकविमा ऐच्छिक ठेवला आहे. शेतकऱ्यांचा हिस्सा वगळल्यानंतर ३० ऐवजी ५० टक्के केंद्राने जबाबदारी ठेवावी, अशी मागणी होती. परंतु ३० टक्के प्रीमियमची जबाबदारी केंद्राने राज्य सरकारवर टाकली. केंद्र शासनाने स्वत:ची जबाबदारी झटकली आहे. यासंदर्भात ज्या ज्या पातळीवरून चौकशी करावी लागेल, त्या पद्धतीने चौकशी केली जाईल. या सगळ्या प्रकरणात खोलात जाऊन चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दोषींवर कारवाई करण्यात येईल

कृषिमंत्री भुसे म्हणाले, जास्तीच्या दराने खतांची विक्री झाली आहे. जी जास्तीची रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली गेली, ती परत शेतकऱ्यांना मिळावी यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. ज्यांनी जुना स्टॉक जास्त किमतीने विकला, त्याबाबत रेकॉर्डनिहाय कारवाई करण्यात येणार आहे. खतांच्या पूर्ण व्यवहारांची उलटतपासणी करण्यात येणार आहे. दोषींवर कारवाई करण्यात येईल. खतांच्या किमती आणि सवलती हा काही राजकारणाचा विषय नाही.