शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
4
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
5
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
6
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
7
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
8
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
9
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
10
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
11
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
12
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
13
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
14
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
15
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
16
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
17
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
18
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
19
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
20
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर

पिकांची वाढ खुंटली

By admin | Updated: July 28, 2014 00:56 IST

लातूर : पावसाळ्याचे दोन महिने उलटत आले तरी वरुणराजाने अद्याप पोषक हजेरी लावली नाही. तुटपुंज्या पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या आहेत.

लातूर : पावसाळ्याचे दोन महिने उलटत आले तरी वरुणराजाने अद्याप पोषक हजेरी लावली नाही. तुटपुंज्या पावसावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपून घेतल्या आहेत. शनिवारपर्यंत जवळपास ८९.४ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली. परंतु, पाऊसच नसल्याने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यांत पेरणी झालेली पिके आता कोमेजू लागली आहेत. शिवाय, वाढ खुंटल्याने आजच्या परिस्थितीनुसार उत्पादनात २० टक्के घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षाच नव्हे तर अगदी गतवर्षीच्याही तुलनेत अत्यंत तोकडा पाऊस यंदा झाला आहे. जिल्ह्यात जून महिन्यामध्ये सरासरी १४५ मि.मी. पाऊस होतो. परंतु, यंदा केवळ ४७.०७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ऐन पेरणीच्या हंगामातच पाऊस कमी झाल्याने पेरण्या लांबल्या. दरम्यान, जुलै महिन्यात दोन टप्प्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस पडला. जुलै महिन्याची सरासरी १६७ मि.मी. इतकी आहे. तुलनेत २७ जुलैपर्यंत १०७.८ मि.मी. पावसाची नोंद कृषी विभागाच्या अहवालानुसार झाली आहे. या तीन टप्प्यांत झालेल्या पावसामुळे पेरण्याही तीन टप्प्यांतच पार पडल्या. शनिवारपर्यंत जवळपास ८९.४ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणीयोग्य क्षेत्र ५ लाख ५६ हजार ८६० हेक्टर्स आहे. त्यापैकी यंदा ४ लाख ९७ हजार ९१८ हेक्टर्स क्षेत्रावर पेरणी झाली. त्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबीनचे आहे. यंदा तब्बल ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीन पेरलेले आहे. त्यापाठोपाठ ९१ हजार ३ हेक्टर्स क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात आली आहे. ३७ हजार ७११ हेक्टर्स क्षेत्रावर ज्वारीची तर मूग ९३७९, उडीद ६८४८, मका ५२५५ हेक्टर्स क्षेत्रावर पेरला गेला आहे. भुईमूग १५३३, बाजरी १०७९ हेक्टर्स क्षेत्रावर तर कापसाची लागवड १६३२ हेक्टर्स क्षेत्रावर करण्यात आली आहे.पेरणी पूर्णत्वाकडे आली असली, तरी जिल्ह्यात अद्याप पावसाची पाठच असल्याने पिके आता कोमेजू लागली आहेत. जूनच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या पावसानंतर पेरणी झालेल्या क्षेत्रावरील पिकांची वाढ मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. जूनच्या अखेरीस व जुलैच्या सुरुवातीस झालेल्या पावसानंतर पेरणी झालेल्या पिकांची अवस्थाही कोमेजल्यासारखी बनली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ...पर्जन्यमान कमी होत चालल्याने वर्षागणिक सोयाबीनची पेरणी झपाट्याने वाढू लागली आहे. कृषी विभागाच्या सांख्यिकीनुसार जिल्ह्यातील सोयाबीनचे सरासरी पेरणीक्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स आहे. परंतु, दोन वर्षांत यात भरमसाठ वाढ झाली आहे. गतवर्षी ३ लाख ३५ हजार ३६० हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. यंदा ३ लाख ३७ हजार १९८ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.शेतकरी अडकले विवंचनेत...पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. शिवाय, अधूनमधून उन्हाचा कडाका सुरू असल्याने पिके आता कोमेजू लागली आहेत. आजघडीला पिकांची जी परिस्थिती आहे, त्यानुसार उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. दरम्यान, सध्या बहुतेक शेतकऱ्यांनी दुंडे धरले आहेत. परंतु, दुंड्यामुळे ओलसर माती उघडी होऊन जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. त्यामुळे पिकांची परिस्थिती आणखीनच बिकट बनण्याची भीती आहे. दुंडे न मारल्यास तण वाढून उत्पादन घटण्याची भीती असल्याने सध्या विवंचनेत असल्याचे शेतकरी गंगाधर गरिबे, अमर सुरवसे, बालाजी हाडोळे म्हणाले.