शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
3
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
4
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
5
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
6
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
7
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
8
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
9
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
10
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
11
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
12
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
13
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
14
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
15
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
16
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
17
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
18
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
19
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
20
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू

निकष डावलून

By admin | Updated: August 13, 2016 00:12 IST

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीसाठी तेराव्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये सुमारे दहा लाखांवर निधी मंजूर झाला होता.

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीसाठी तेराव्या वित्त आयोगातून सन २०१४-१५ मध्ये सुमारे दहा लाखांवर निधी मंजूर झाला होता. या निधीतून गावामध्ये विकास कामे राबविणे बंधनकारक होते. परंतु, तत्कलीन सरपंच, ग्रामसेवकांनी या निकषाकडे कानाडोळा करीत गाव अथवा वाडी-वस्तीला न जोडणाऱ्या रस्त्यावर सुमारे १० लाख ३० हजार रूपये खर्च केले. यासंबंधी तक्रारी झाल्यानंतर आलेल्या चौकशीतून हा नियमबाह्य कारभार उजेडात आला आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते यांनी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून प्रत्येकी पन्नास टक्के रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. परंडा तालुक्यातील खासगाव ग्रामपंचायतीअंतर्गत विकास कामे करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून सुमारे १० लाख ३० हजार ३५२ रूपये एवढ निधी मंजूर झाला होता. ही रक्कम संतुलित ग्राम समृद्ध योजनेसंबंधी खर्च करणे अपेक्षित होते. सदरील कामे गावाबाहेर नव्हे, तर गावात राबविणे बंधनकारक होते. परंतु, ग्रामपंचायतीकडून याच निकषाकडे कानाडोळा करण्यात आला. शासनाने घालून दिलेले नियम, दंडक धाब्यावर बसून गावापासून अंदाजे एक ते दीड किमी अंतरावर खासगाव ते बेडगा या शिवरस्त्याचे काम करण्यात आले. हा रस्ता कोणतेही गाव अथवा वाडीला जोडणारा नाही. दरम्यान, सदरील प्रकार समोर आल्यानंतर गावातीलच कालिदास नामदेव जगदाळे यांनी प्रशासनाकडे धाव घेत रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीअंती सुमारे १० लाख ३० हजार ३५२ रूपये शासनाच्या निकषानुसार खर्च केले नसल्याचा ठपका तत्कालीन प्रभारी सरपंच बबनराव लिमकर, ग्रामसेविका एस. के. आगरकर यांच्यावर ठेवण्यात आला होता. उपरोक्त रक्कम सरंपच, ग्रामसेवकाकडून प्रत्येकी ५० टक्के या प्रमाणात वसूल करण्यात यावी, अशी शिफारसही अहवालामध्ये केली होती. तसेच तत्कालीन शाखा अभियंता बी. बी. डांगे यांच्याविरूद्ध शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावित करणेबाबत अहवालाद्वारे कळविले होते. दरम्यान, सदरील प्रकरण मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. सुनावणीनंतर पुन्हा चौकशीचे आदेश दिले. शाखा अभियंता एम. डी. म्हेत्रे व विस्तार अधिकारी पी. एस. गलांडे यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. या अहवालामध्येही सदरील काम नियमबाह्यरित्या म्हणजेच निकष डावलून केल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सदरील प्रक्रिया होवून काही महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु, अद्याप १० लाख ३० हजार रूपये वसूल झालेले नाहीत. (प्रतिनिधी) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये तत्कालीन प्रभारी सरपंच बबनराव लिमकर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. तर शाखा अभियंता म्हेत्रे व विस्तार अधिकारी गलांडे यांनी केलेल्या चौकशी अहवालामध्ये तत्कालीन सरपंच भारत दशरथ थाटे यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकारास दोघापैैकी नेमके जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. निकष डावलून रस्त्याचे काम केल्यामुळे सदरील रक्कम तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकाकडून वसूल करण्याचे आदेश आहेत. परंतु, ज्यांनी हा गोंधळ घातला, त्यांचे दुसऱ्यांदा झालेल्या चौकशी अहवालात नाव नाही, असा आरोप करीत या प्रकरणी फेर सुनावणी घेण्याची मागणी कालिदास जगदाळे यांनी केली आहे.