शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

वक्फ मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. अनेक वर्षांपासून बोर्डाची आर्थिक ...

औरंगाबाद : वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. अनेक वर्षांपासून बोर्डाची आर्थिक स्थिती अत्यंत खराब आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यावरही भविष्यात भर देण्यात येणार आहे.

मागील काही वर्षांपासून वक्फ बोर्डाची बैठकच घेण्यात आली नव्हती. शुक्रवारी दुपारी महसूल प्रबोधिनी येथे खा. फौजिया खा. यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली. सायंकाळी उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. त्यानंतर फौजिया खा. यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वक्फ बोर्डाशी संबंधित विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वक्फची जमीन सामाजिक उपक्रमांसाठी वापरायला हवी. मागील काही वर्षांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. बोर्डाच्या सर्व सदस्यांनी महाराष्ट्र वक्फ बोर्डाला देशातील सर्वोत्तम बोर्ड करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. बदलापूर येथे ज्या पद्धतीने गुन्हा दाखल केला, त्याचपद्धतीने जालना रोडवरील जमीन घोटाळ्यात गुन्हे दाखल करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. बोर्डाचे मुख्यालय औरंगाबादला ठेवून विभागीय कार्यालय मुंबईला करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. बोर्डात नूतनीकरणाची जवळपास १८०० प्रकरणे प्रलंबित आहेत. ही प्रकरणे त्वरित मार्गी लावणे, जिल्हानिहाय बैठका, कर्मचारी भरती, रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे आदी मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली. न्यायालयांमध्ये बोर्डाची भूमिका योग्यप्रकारे न मांडणाऱ्या विधिज्ञांना पॅनलवरून हटविण्याचा निर्णयही यावेळी घेतला.

बैठकीस खा. इम्तियाज जलील यांचीही उपस्थिती होती. माजी अध्यक्ष एम. एम. शेख, डाॅ. वजाहत मिर्झा, ॲड. ए. यू. पठाण, डॉ. मुदस्सर लांबे आदी उपस्थित होते.