शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

नव्याने मेरिट लिस्ट तयार करा

By admin | Updated: April 26, 2015 01:00 IST

औरंगाबाद : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेचे (पीजीएम-सीईटी) नव्याने गुणदान करून मेरिट यादी लावावी अथवा नव्याने सीईटी घ्यावी,

औरंगाबाद : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षेचे (पीजीएम-सीईटी) नव्याने गुणदान करून मेरिट यादी लावावी अथवा नव्याने सीईटी घ्यावी, या मागणीसंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय शिक्षण संचालनालयास शुक्रवारी दिले आहेत.वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने ४ जानेवारी रोजी राज्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशपूर्व परीक्षा (पीजीएम-सीईटी) घेतली. ९ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ७ जानेवारी रोजी संचालनालयाने या परीक्षेची उत्तरतालिका (अन्सर की) वेबसाईटवर प्रसिद्ध केली आणि १२ जानेवारीपर्यंत आक्षेप मागविले. या परीक्षेतील १७ प्रश्नांना चारपैकी दोन उत्तरे बरोबर देण्यात आल्याचे आर्मी कॉलेजने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी दोन बरोबर पर्यायपैकी एक उत्तर दिलेले आहे, त्यांना गुण देण्याचा निर्णय घेतला आणि पहिली निवड यादी ३० मार्च रोजी प्रकाशित केली. या मेरिट यादीला सिल्लोड (जि.औरंगाबाद) येथील डॉ. माधुरी ईश्वर राजपूत यांनी आक्षेप घेणारे निवेदन संचालनालयास सादर केले. या निवेदनात त्यांनी चार पर्यायांपैकी दोन बरोबर उत्तरे देऊन विद्यार्थ्यांना संभ्रमित केले. त्यामुळे ४३ प्रश्नांना सर्वांना गुणदान करून नव्याने मेरिट यादी लावावी, अथवा नव्याने सीईटी घ्यावी, प्रवेश प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी केली. त्यांच्या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे डॉ. माधुरी यांनी अ‍ॅड. सुनील वै. वारद यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाली असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिले.राज्यभरातून १२ हजार ५३५ आक्षेप नोंदविल्या गेले. या आक्षेपांची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने वर्धा येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस या संस्थेतील तज्ज्ञ कमिटीकडून अहवाल मागविला.वर्धा कमिटीने या परीक्षेत १३ प्रश्न चुकीचे असल्याचे जाहीर केले. त्याआधारे त्या १३ प्रश्नांना गुणदान देण्याचा निर्णय संचालनालयाने घेतला. मात्र, विद्यार्थ्यांचे समाधान न झाल्याने संचालनालयाने पुणे येथील आर्मी मेडिकल कॉलेजकडे प्रकरण अहवालासाठी पाठविले. आर्मी कॉलेजने वर्धा कमिटीचा रिपोर्ट चुकीचा असल्याचे नमूद करून २६ प्रश्न चुक लेले असल्याचे स्पष्ट केले. त्याआधारे संचालनालयाने चुकलेल्या २६ प्रश्नांना गुणदान देण्याचा निर्णय घेतला.