शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

निकालाचे ‘काऊंट डाऊन’ सुरू!

By admin | Updated: May 14, 2014 00:40 IST

जालना : लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचा अंतिम निकाल शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत हाती येईल, असा अंदाज जिल्हा निवडणूक विभागाने वर्तविला आहे.

जालना : लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीचा अंतिम निकाल शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत हाती येईल, असा अंदाज जिल्हा निवडणूक विभागाने वर्तविला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरच जिल्हा निवडणूक विभागाने सर्वतोपरी जय्यत तयारी सुरू केली आहे. विशेषत: मतमोजणीकरीता विविध विभागांतर्गत अधिकार्‍यांसह सुमारे ४०० वर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्या सर्वांना या विभागाने प्रशिक्षण दिले असून, हे सर्व अधिकारी- कर्मचारी या मतमोजणीच्या प्रक्रियेत पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतनच्या सभागृहात ही मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, त्या दृष्टिकोनातून मतमोजणीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जालना, भोकरदन, बदनापूर, सिल्लोड, पैठण, फुलंब्री या सहा विधानसभा मतदारसंघातील १७४१ बुथवरील मशिन्सची मतमोजणी एकाच वेळी सुरू होणार आहे. मतमोजणीच्या जवळपास २५ फेर्‍या होतील, असा अंदाज आहे. जालना, भोकरदन आणि पैठण या तीन विधानसभेच्या प्रत्येकी २२ फेर्‍या होणार आहेत, सिल्लोडच्या २१ व फुलंब्री विधानसभेच्या २३ फेर्‍या होणार असून सर्वाधिक २५ फेर्‍या बदनापूर विधानसभेच्या होणार आहेत. या मतमोजणीचा कल तिसर्‍या किंवा चौथ्या फेरीपासूनच लक्षात येईल, असा अंदाज आहे. संपूर्ण मतमोजणीचा अंतिम निकाल निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखविल्याबरोबर दुपारी २ च्या सुमारास जाहीर होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. जालना विधानसभा मतदारसंघात १ लाख ५३ हजार १०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बदनापूरात १ लाख ८० हजार ४४, भोकरदन १ लाख ८५ हजार ११०, सिल्लोड १ लाख ७९ हजार ६६९, फुलंब्री १ लाख ८९ हजार ५८६ व पैठण विधानसभा मतदारसंघात १ लाख ७७ हजार ९३३ एवढ्या मतदारांनी असे एकूण १० लाख ६५ हजार ४४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, या मतदारसंघात चौथ्या टप्प्यात मतदान झाले. २४ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालासाठी उमेदवारांसह मतदारांना २२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली. आता निकालाचे काऊंट डाऊन सुरू झाले असून, अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निकालांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल कुणाला असणार हे शुक्रवारीच समजणार आहे. (प्रतिनिधी) २५ फेर्‍यांत मतमोजणी होणार या लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय मतमोजणी होणार असून, पहिल्या फेरीपासूनच कोणत्या विधानसभेतून कोणाला मताधिक्य आहे, हे सहजपणे कळणार आहे. मतमोजणीच्या सरासरी २५ फेर्‍या होतील, असा अंदाज आहे. औरंगाबाद रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या सभागृहात सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होणार असून, त्याठिकाणी अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी प्रशासनाने चहा-नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली आहे. या मतदारसंघात ६६.२० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जालना विधानसभेत ५४.१०, बदनापूर ६६.६०, भोकरदन ७१.४३, सिल्लोड ६७.३८, फुलंब्री ६८.७६ व पैठण विधानसभेत ६९.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.