शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
2
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
3
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
4
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
5
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
6
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
7
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
8
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
9
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
10
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
11
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
12
"ठाकरे बंधू बोलबच्चन...; बाळासाहेबांनंतर मराठी माणसांच्या मनात एकनाथ शिंदेंचं स्थान"
13
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
14
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा
15
"मी २५ वर्षाची अन् बॉयफ्रेंड ७६ वर्षाचा, तरीही खूप खुश"; इंटरनेटवर व्हायरल जोडपं, गर्लफ्रेंड म्हणते...
16
Gold Silver Price 22 August: सोनं महागलं, चांदी सुस्साट; किंमतीत ₹१४४१ ची वाढ, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
17
या ₹15 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरला 5 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल! पण कारण काय?
18
ICC Women’s World Cup 2025 : ...तर नवी मुंबईतील मैदानात रंगणार वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनल
19
WhatsApp वापरणाऱ्या प्रत्येकालाच 'हे' सीक्रेट सिक्युरिटी फीचर्स माहीत असायला हवेत!
20
"क्लर्कची नोकरी जाते, तर मुख्यमंत्री, पंतप्रधानांची खुर्ची का नाही?"; PM मोदी भ्रष्टाचार विरोधी विधेयकावर काय बोलले?

मका क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार !

By admin | Updated: June 22, 2014 00:49 IST

औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला; पण अजूनही पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.

औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला; पण अजूनही पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. दुसरीकडे कपाशी बियाणांची ४० टक्के विक्री झाली आहे, तसेच ७१ हजार २०० मे. टन खताचाही पुरवठा झाला आहे. गेल्या वर्षी मक्याला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी यंदा कपाशी लागवड करण्यास अधिक उत्सुक आहेत. परिणामी, मक्याच्या क्षेत्रात ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशीपेक्षा मक्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. येत्या १२ दिवसांत किती पाऊस पडतो यावर कपाशी किंवा मका क्षेत्राची वाढ अवलंबून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी ६ लाख ५१ हजार ५०० हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात आली होती. यंदा ६ लाख ५५ हजार ६०० हेक्टरपर्यंत या खरीप क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विभागीय कृषी विभागाने यंदा कपाशीचे क्षेत्र घटून मक्याचे क्षेत्र वाढणार, असे गृहीत धरून खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र, बाजारपेठेतील कपाशीची विक्री लक्षात घेता यंदा मक्याचे क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी व कंपनीचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. खरीप क्षेत्रातील पेरणीचे परस्पर विरोधी दावे केले जात असले तरीही प्रत्यक्षात येत्या १२ दिवसांत किती पाऊस पडतो यावर खरीप क्षेत्रात वाढ किंवा घट अवलंबून राहणार आहे. औरंगाबादेत कपाशीनंतर सर्वांत मका सुपरहीट ठरला आहे. दोन्ही पिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दाम मिळवून दिला आहे. मात्र, मागील वर्षी मक्याला ९०० ते १,२२५ रुपये प्रतिक्विंटलदरम्यान भाव मिळाला होता. कापूस ४,००० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. विशेष म्हणजे अवकाळी पावसाने काही भागात दुबार कपाशीला फायदाच झाला. यात कपाशी उत्पादकाने कमावून घेतले. मात्र, दुसरीकडे मका मातीमोल भावात विकावा लागला. एप्रिलपासूनच कपाशी बियाणांची विक्रीज्या शेतातील विहिरीत पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासूनच कपाशी बियाणे खरेदीला सुरुवात केली. बी-बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, जिल्ह्यात कपाशीची १२ लाख पाकिटे विकली जातात. आजघडीपर्यंत ४० टक्के कपाशी बियाणे विक्री झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करूनही टाकली आहे. गेल्यावर्षी मक्याला कमी भाव मिळाल्याने यंदा कपाशीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अशीच मागणी राहिली तर कपाशी बियाणांच्या १६ लाख पाकिटांची विक्री होईल. बियाणे कंपन्यांनी जिल्ह्यात केलेल्या सर्व्हेनुसार मक्याचे क्षेत्र ३० टक्क्यांनी घटणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. कृषी विभागाचे नियोजन कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले. यात जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात घट होईल व मक्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत २ लाख ३,८०० हेक्टरपेक्षा अधिक मक्याचे सरासरी क्षेत्र आहे. मात्र, यंदा ३ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. बाजारात उलटी परिस्थिती दिसत असून, मक्यापेक्षा कपाशीच्या बियाणाची अधिक खरेदी होत आहे.७१ हजार मे. टन खताचा पुरवठाजिल्ह्यात खरीप हंगामात २ लाख ३१ हजार मे. टन खताची आवश्यकता भासणार आहे. त्यात जून महिन्यात १ लाख मे. टन खतपुरवठ्याचे नियोजन आहे. आजघडीपर्यंत ७१ हजार २०० मे. टन खताचा पुरवठा झाला आहे. जिल्ह्यात खत व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कृत्रिम टंचाई दाखवून कोणी जास्त किमतीत बियाणे किंवा खत विक्री करीत असेल, तर त्यांची माहिती कृषी विभागाला कळवा, असे आवाहन कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी केले आहे.