शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

मका क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार !

By admin | Updated: June 22, 2014 00:49 IST

औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला; पण अजूनही पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे.

औरंगाबाद : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला; पण अजूनही पेरणीसाठी जोरदार पावसाची प्रतीक्षाच आहे. दुसरीकडे कपाशी बियाणांची ४० टक्के विक्री झाली आहे, तसेच ७१ हजार २०० मे. टन खताचाही पुरवठा झाला आहे. गेल्या वर्षी मक्याला मिळालेल्या कमी भावामुळे शेतकरी यंदा कपाशी लागवड करण्यास अधिक उत्सुक आहेत. परिणामी, मक्याच्या क्षेत्रात ३० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशीपेक्षा मक्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज कृषी विभागाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. येत्या १२ दिवसांत किती पाऊस पडतो यावर कपाशी किंवा मका क्षेत्राची वाढ अवलंबून राहील. औरंगाबाद जिल्ह्यात गेल्यावर्षी ६ लाख ५१ हजार ५०० हेक्टरवर खरीप पेरणी करण्यात आली होती. यंदा ६ लाख ५५ हजार ६०० हेक्टरपर्यंत या खरीप क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विभागीय कृषी विभागाने यंदा कपाशीचे क्षेत्र घटून मक्याचे क्षेत्र वाढणार, असे गृहीत धरून खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. मात्र, बाजारपेठेतील कपाशीची विक्री लक्षात घेता यंदा मक्याचे क्षेत्र घटून कपाशीची लागवड वाढणार असल्याचा अंदाज व्यापारी व कंपनीचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. खरीप क्षेत्रातील पेरणीचे परस्पर विरोधी दावे केले जात असले तरीही प्रत्यक्षात येत्या १२ दिवसांत किती पाऊस पडतो यावर खरीप क्षेत्रात वाढ किंवा घट अवलंबून राहणार आहे. औरंगाबादेत कपाशीनंतर सर्वांत मका सुपरहीट ठरला आहे. दोन्ही पिकांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दाम मिळवून दिला आहे. मात्र, मागील वर्षी मक्याला ९०० ते १,२२५ रुपये प्रतिक्विंटलदरम्यान भाव मिळाला होता. कापूस ४,००० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री झाला. विशेष म्हणजे अवकाळी पावसाने काही भागात दुबार कपाशीला फायदाच झाला. यात कपाशी उत्पादकाने कमावून घेतले. मात्र, दुसरीकडे मका मातीमोल भावात विकावा लागला. एप्रिलपासूनच कपाशी बियाणांची विक्रीज्या शेतातील विहिरीत पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी एप्रिल महिन्यापासूनच कपाशी बियाणे खरेदीला सुरुवात केली. बी-बियाणे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी सांगितले की, जिल्ह्यात कपाशीची १२ लाख पाकिटे विकली जातात. आजघडीपर्यंत ४० टक्के कपाशी बियाणे विक्री झाले आहे. काही शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड करूनही टाकली आहे. गेल्यावर्षी मक्याला कमी भाव मिळाल्याने यंदा कपाशीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अशीच मागणी राहिली तर कपाशी बियाणांच्या १६ लाख पाकिटांची विक्री होईल. बियाणे कंपन्यांनी जिल्ह्यात केलेल्या सर्व्हेनुसार मक्याचे क्षेत्र ३० टक्क्यांनी घटणार असल्याची आकडेवारी समोर आली आहे. कृषी विभागाचे नियोजन कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले. यात जिल्ह्यात कपाशीच्या क्षेत्रात घट होईल व मक्याचे क्षेत्र वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांत २ लाख ३,८०० हेक्टरपेक्षा अधिक मक्याचे सरासरी क्षेत्र आहे. मात्र, यंदा ३ लाख ५० हजार हेक्टरपर्यंत मक्याचे क्षेत्र वाढणार आहे. बाजारात उलटी परिस्थिती दिसत असून, मक्यापेक्षा कपाशीच्या बियाणाची अधिक खरेदी होत आहे.७१ हजार मे. टन खताचा पुरवठाजिल्ह्यात खरीप हंगामात २ लाख ३१ हजार मे. टन खताची आवश्यकता भासणार आहे. त्यात जून महिन्यात १ लाख मे. टन खतपुरवठ्याचे नियोजन आहे. आजघडीपर्यंत ७१ हजार २०० मे. टन खताचा पुरवठा झाला आहे. जिल्ह्यात खत व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. आता पेरणीसाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कृत्रिम टंचाई दाखवून कोणी जास्त किमतीत बियाणे किंवा खत विक्री करीत असेल, तर त्यांची माहिती कृषी विभागाला कळवा, असे आवाहन कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी केले आहे.