शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

मनपाचे आश्वासन करवसुलीपुरतेच

By admin | Updated: May 21, 2014 01:13 IST

औरंगाबाद : महानगरपालिकेने व्यापार्‍यांना दंड व व्याज न आकारता मालमत्ताकर वसुलीचा धाडसी निर्णय घेतला; पण त्या बदल्यात बाजार समितीत सुविधा पुरविण्याचे आश्वासन पाळले नाही.

औरंगाबाद : महानगरपालिकेने व्यापार्‍यांना दंड व व्याज न आकारता मालमत्ताकर वसुलीचा धाडसी निर्णय घेतला; पण त्या बदल्यात बाजार समितीत सुविधा पुरविण्याचे आश्वासन पाळले नाही. यामुळे अडत व्यापार्‍यांत नाराजी आहे. महानगरपालिकेचा मालमत्ताकर भरण्यास जाधववाडीतील अडत व्यापारी तयार होते. वेळोवेळी तत्कालीन आयुक्तांना त्यांनी निवेदनही दिले होते. जाधववाडीत महानगरपालिका गेल्या १६ वर्षांपासून कोणतीच सुविधा पुरवत नाही. बाजार समिती प्रशासनच येथे विहिरीद्वारे पाणीपुरवठा, साफसफाई, पथदिवे आदी सुविधा देत आहे. कोणतीच मूलभूत सुविधा न देताही महानगरपालिका जाधववाडीतील अडत व्यापार्‍यांकडून मालमत्ता कर वसूल करण्याचा प्रयत्न करीत होती. कर भरण्यास व्यापार्‍यांनी कधीही विरोध केला नाही; परंतु मागे मालमत्ताकर वेळेत न भरल्याने आकारलेला दंड व व्याज माफ करावे, अशी त्यांची मागणी होती. मात्र, याआधीच्या कोणत्याच आयुक्त व मालमत्ताकर वसुली अधिकार्‍याने या मागणीवर ठोस निर्णय घेतला नाही. व्यापार्‍यांनी वेळोवेळी दिलेले निवेदन व मालमत्ताकर वसुलीत मनपाकडूनच झालेल्या दिरंगाईचा विचार करीत आयुक्त हर्षदीप कांबळे यांनी धाडसी निर्णय घेत जाधववाडीतील अडत व्यापार्‍यांना याआधी आकारलेला मालमत्ताकरावरील दंड व व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला. अडत व्यापार्‍यांनीही यास प्रतिसाद देत मार्च २०१५ पर्यंतची मालमत्ताकराची थकीत रक्कम तीन टप्प्यांत देण्याचा निर्णय घेतला व पहिल्या टप्प्यात दीड ते दोन कोटींची रक्कम मनपाकडे भरलीही. यासंदर्भात अडत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संजय पहाडे म्हणाले की, बैठकीत मनपा आयुक्तांनी आश्वासने दिली होती. यात मार्केट यार्डमध्ये शुद्ध पाणीपुरवठा करणे, साफसफाई कर्मचारी नेमणे, पथदिवे सुरू करणे, कोंडवाड्यासाठी कर्मचारी नेमणे या बाबींचा समावेश होता. आश्वासने देऊन दोन महिने उलटले तरी महानगरपालिकेने आश्वासनांच्या पूर्ततेसाठी काही केले नाही. या आवश्यक सुविधा न दिल्यास एलबीटीप्रमाणे मालमत्ताकर प्रश्नावर असहकार आंदोलन सुरू केले जाईल, असा इशारा पहाडे यांनी दिला.