शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

केवळ पर्यटन स्थळांमुळेच कोरोना पसरतोय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:04 IST

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दि. ११ मार्चपासून शहरातील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक स्मारके बंद केली ...

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दि. ११ मार्चपासून शहरातील पर्यटनस्थळे आणि ऐतिहासिक स्मारके बंद केली आहेत. ८-९ महिन्यांचा लॉकडाऊन सोसल्यानंतर पुन्हा बसलेला हा फटका पर्यटन जगताला आता मात्र असह्य होत आहे. या क्षेत्रातील हजारो लोकांवर उपासमारीची वेळ आली असून, कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

शहरात होणाऱ्या गर्दीपेक्षा तर पर्यटनस्थळे निश्चितच सुरक्षित आहेत. त्यामुळे इतर व्यवसाय जसे सुरू ठेवण्यास परवानगी दिली, तशीच अटी आणि नियमांचे पालन करून आम्हालाही आमचा व्यवसाय करण्यास परवानगी द्या, असे आवाहन पर्यटन जगत करत आहे.

प्रतिक्रिया-

१. आम्हालाही पोट भरायचे आहे

अजिंठा - वेरुळसह शहरातील सर्वच पर्यटन स्थळांचा परिसर विस्तीर्ण आहे. दररोज पर्यटनस्थळी येणाऱ्या पर्यटकांची संख्या २०० पेक्षाही कमी असते. याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे उत्तम पालन होऊ शकते. सध्या बाजारपेठ, मॉल, भाजी मंडई याठिकाणी दररोज होणारी गर्दी पाहता, यापेक्षा तर पर्यटनस्थळे निश्चितच सुरक्षित आहेत. मग केवळ आमच्यावरच हा अन्याय का? शासन आमच्यासाठी काही विशेष तरतूदही करत नाही. पर्यटन व्यावसायिकांनाही पोट भरायचे आहे, आम्हालाही घर चालवायचे आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे आणि पर्यटनस्थळे पुन्हा सुरू करावीत.

- सय्यद अबरार हुसैन

टुरिस्ट गाईड

२. पर्यटनावर दूरगामी परिणाम

मॉल, बाजार, हॉटेल्स, रेस्टॉरंट सारे काही अटी आणि नियमांसह चालू आहे. मग केवळ पर्यटन स्थळांमुळेच काय बिघडते? इतरांप्रमाणे आम्हीही पूर्ण काळजी घेऊन आणि अटी, नियम पाळून व्यवसाय करू. जिल्हा प्रशासनाच्या अशा धोरणामुळे शहराच्या पर्यटनाची ‘निगेटिव्ह पब्लिसिटी’ होत आहे. याचा शहराच्या पर्यटनावर दूरगामी परिणाम होऊन मोठा फटका बसत आहे. यामुळे शहर पर्यटनाच्याबाबतीत १५ - २० वर्षे मागे फेकले जात आहे.

- जसवंतसिंह

पर्यटन व्यावसायिक