शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३ बालकांचे आई-वडिलांचे छत्र कोरोनाने हिरावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST

औरंगाबाद : कोरोनाने जीवन जगण्याची दिशा बदलून अनेकांची दशा केली आहे. अनेक कुटुंबं या विषाणूच्या संसर्गाने उद्‌ध्वस्त झाले असून, ...

औरंगाबाद : कोरोनाने जीवन जगण्याची दिशा बदलून अनेकांची दशा केली आहे. अनेक कुटुंबं या विषाणूच्या संसर्गाने उद्‌ध्वस्त झाले असून, जिल्ह्यातील १३ बालकांचे आई आणि वडिलांचे छत्र या विषाणूने हिरावून घेतले. माता-पित्यांविना पोरक्या झालेल्या या बालकांना बालगृहात ठेवण्यात येणार आहे. त्यांना ११०० रुपये अनुदान दरमहा देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ३३९ बालकांचे आई किंवा वडील कोरोनाने दगावले आहेत. त्यांना देखील शासन योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.

एक पालक गमावलेल्या ३२६ आणि दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांना शासनाच्या नियमानुसार सर्व योजनांचा, २६५ विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दोन्ही पालक गमावलेल्या १३ बालकांपैकी तीन बालकांना बालगृहात प्रवेशित करण्यात येणार आहे. तर १० बालकांना बालकल्याण समितीसमोर उपस्थित करून दरमहा अकराशे रुपये योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. लाभ देण्याची कार्यवाही आठवडाभरात पूर्ण करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले असे आदेश

कोरोना विषाणूमुळे आई वडिलांपैकी एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांच्या न्याय्य हक्काबरोबरच शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ मिळवून द्या, असे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना मंगळवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृहात जिल्हा कृती दलाची बैठक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, समिती अध्यक्ष ज्योती पत्की, अधिकारी हर्षा देशमुख, प्रसाद मिरकले, महादेव डोंगरे, चाईल्ड हेल्पलाईन, प्रकल्प संचालक आप्पासाहेब उगले आदींसह विविध संस्था, पोलीस अधिकारी आदी उपस्थित होते.