शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

नवीन पाणीपुरवठा योजनेतील कंत्राटदाराने बँक गॅरंटी भरलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:06 IST

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे १२ डिसेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेचे काम ...

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नवीन पाणीपुरवठा योजनेचे १२ डिसेंबर रोजी भूमिपूजन करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे बँक गॅरंटी जमा केलेली नाही. त्यामुळे काम सुरू होण्यास आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे.

शहराची तहान भागविण्यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम हैदराबाद येथील जीव्हीपीआर या कंपनीला ९.९ टक्के जास्त दराने देण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते औरंगाबादेत मोठ्या थाटात करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कंत्राटदार कंपनीला बँक गॅरंटीपोटी २६ कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले. २० डिसेंबरपर्यंत बँक गॅरंटी भरणे अपेक्षित होते. मात्र, कंत्राटदाराने अद्यापही बँक गॅरंटी भरलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कंत्राटदार संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे उशीर होत आहे. अद्याप कंपनीने औरंगाबाद शहरात कार्यालय सुरू करण्यासाठीच्या हालचाली देखील सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे योजनेचे काम प्रत्यक्ष केव्हा सुरू होईल, याविषयी देखील साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

चार दिवसांत बँक गॅरंटी भरणार

कंपनीने बँक गॅरंटी भरण्यासाठी मुदतवाढीची मागणी केली होती. ख्रिसमसनंतर नवीन वर्षात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बँक गॅरंटी भरू, असे पत्र कंपनीने दिले आहे. त्यामुळे कंपनीला बँक गॅरंटी भरण्यासाठी अवधी दिला असून, आगामी चार दिवसांत कंपनी प्रक्रिया पूर्ण करेल.

- अजयसिंह, अधीक्षक अभियंता, एमजेपी.