शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

ज्येष्ठ नागरिकांचे ठिय्या आंदोलन सुरू

By admin | Updated: August 14, 2014 02:09 IST

नांदेड : उतारवयात कुटुंबियांनी दुर्लक्ष केले, नातेवाईकही पाठ फिरवतात आता शासन मायबापच काहीतरी देईल या अपेक्षेने हजारो वृध्द महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देवून बसले आहेत़

नांदेड : उतारवयात कुटुंबियांनी दुर्लक्ष केले, नातेवाईकही पाठ फिरवतात आता शासन मायबापच काहीतरी देईल या अपेक्षेने हजारो वृध्द महिला व पुरूष जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देवून बसले आहेत़ या आंदोलनाबाबत सायंकाळपर्यंत तरी कोणताही तोडगा निघाला नव्हता़ सहयोग ज्येष्ठ नागरिक महासंघाच्यावतीने ज्येष्ठांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आल्यानंतर या मोर्चेकऱ्यांनी धरणे धरले़ हे धरणे आता प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहतील असा पवित्रा घेतला आहे़ ज्येष्ठांनी वयोमर्यादा ६५ वर्षाऐवजी केंद्र शासनाप्रमाणे ६० वर्ष करावी, सर्व ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाची मर्यादा न ठेवता प्रति माह किमान २ हजार ५०० रूपये मानधन सुरू करावे, ज्येष्ठ नागरिकांसाठी दारिद्र्य रेषेखालील नाव असणे बंधनकारक असू नये, राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत उत्पन्नाची अट न ठेवता सर्वच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करावा, सर्व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विमा शासनाने चालू करावी, १ आॅक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या जेष्ठ नागरिक धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, संपूर्ण राज्यात, मनपा, नपा अंतर्गत सुरू असणाऱ्या बससेवेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेप्रमाणे ५० टक्के सवलत असावी तसेच रेल्वे, विमान प्रवासातही सवलत द्यावी आदी मागण्या केल्या आहेत़ ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या मान्य न केल्यास सत्ताधाऱ्यांना त्याचा मोठा फटका बसेल असा इशाराही यावेळी देण्यात आला़ ज्येष्ठांच्या मागण्यांसदर्भात २५ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले होते़ त्यामुळे बेमुदत उपोषण करण्यात आले नव्हते़ पण आठ महिन्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने मूकमोर्चा काढण्यात आल्याचे सहयोग ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉ़ हंसराज वैद्य यांनी सांगितले़ या आंदोलनात आनंदराव पाटील, सचीन सोनवणे, डॉ़ पी़ के़ कदम, भास्कर बोकन, ठाकूर, डॉ़ शितल भालके, माधवराव पवार, दिगंबर सोनोणे यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते़ दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांच्या या आंदोलनाला शिवसेनेने पाठींबा दिला असून त्याबाबतचे पत्र जिल्हाप्रमुख हेमंत पाटील यांनी दिले़ तसेच मराठा महासंघ आणि तिरंगा परिवारनेही पाठींबा दिला आहे़ (प्रतिनिधी)