शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती

By admin | Updated: April 7, 2015 01:21 IST

जालना : पाटबंधारे विभाग औरंगाबाद कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर देखरेख करणे शक्य नसल्याने जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.

जालना : पाटबंधारे विभाग औरंगाबाद कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रावर देखरेख करणे शक्य नसल्याने जिल्ह्यासाठी स्वतंत्र पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाने १ एप्रिल २०१५ रोजी काढले आहेत.राज्यात जालना, गोंदिया, भंडारा व गडचिरोली हे चार जिल्हे सिंचनाच्या बाबतीत अतिमागासलेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री लोणीकर यांनी जालना पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर ठेवला होता.सद्यस्थितीत जालना जिल्ह्यात पूर्ण झालेल्या व नियमित सिंचन सुरू असलेल्या एकूण प्रकल्पांची संख्या ३९ आहे. त्याद्वारे २५,३०६ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झालेले आहे.या क्षेत्राच्या सिंचन व्यवस्थापनाकरीता जालना मुख्यालयी दोन उपविभाग कार्यरत असून ते औरंगाबाद पाटबंधारे विभाग यांच्याशी संलग्न आहेत. जालना लघुपाटबंधारे विभागाकडील पूर्ण झालेले मध्यम व लघुमध्यम प्रकल्पांची संख्या ३८ आहे. त्याद्वारे १८,६१७ हेक्टर क्षमता निर्माण झालेली आहे. असे एकूण ४३.९२३ हेक्टर सिंचन क्षेत्र औरंगाबाद येथून देखरेख करणे शक्य नसल्याने व औरंगाबाद पाटबंधारे विभागाकडील सिंचन क्षेत्रात वाढ झाल्याने जालना येथे सिंचनाकरीता एक स्वतंत्र विभाग निर्माण होणे आवश्यक होते.औरंगाबाद पाटबंधारे विभागासाठी सिंचनाचे पुरेसे क्षेत्र उपलब्ध असून त्याचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तथापि उपरोक्त सिंचनाची आकडेवारी ही एका विभागाकरीता अपुरी असल्याने निम्न दुधना प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना व उजवा व डाव्या कालव्यावरील जून २०१४ अखेर निर्माण झालेली ३१ १६५ हेक्टर सिंचन क्षमता असे एकूण निर्मिती झालेले ७५०८८ हेक्टर सिंचन क्षेत्र एकत्रित करून जालना पाटबंधारे विभागाची निर्मिती करण्यात आली आहे.जिल्ह्यामध्ये लोअर दुधना प्रकल्प पूर्ण झालेला असल्यामुळे सिंचनासाठी पाणीसाठा निर्माण झाला आहे. या धरणाच्या पाण्याचा उपयोग हा जालना व परभणी या दोन जिल्ह्यातील शेतीसाठी तसेच पिण्यासाठी होणार आहे.याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प, जुई, कल्याण, जीवरेखा धामणा मध्यम प्रकल्प याशिवाय अनेक लघुप्रकल्प पूर्ण झालेले आहेत.या सर्व मध्यम व लघु प्रकल्पाच्या सिंचन व्यवस्थापनाचे काम औरंगाबाद पाटबंधारे विभागामार्फत केले जात असे. मात्र या व्यवस्थापनाच्या कामात काही बाबतीत दुर्लख होताना दिसून आल्याचे शासनाच्या निदर्शनास यापुर्वीच आले होते. या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र पाटबंधारे विभाग स्थापण्यासाठी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले.१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार नवीन पाटबंधारे विभाग सुरू करण्यात येत असून या विभागासोबतच पाटबंधारे उपविभाग टेंभूर्णी, अंबड व वाटूर असे तीन नवीन उपविभाग तसेच राजूर, वाटूर, परतूर, अंबड, बदनापूर, तीर्थपुरी येथे प्रत्येकी एक शाखा कार्यालयांचा त्यात समावेश आहे. (प्रतिनिधी)याबाबत पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले, स्वतंत्र विभागाच्या निर्मितीमुळे हा विभाग पूर्ण क्षमतेने जालना जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थापनाची कामे करेल. कालव्याच्या देखभाल दुरूस्तीची कामे नियमित करण्यात येतील. पाणी वापर सहकारी संस्था तातडीने स्थापन करण्यात येतील. त्यामुळे सिंचन व्यवस्थापन सुरळीत होईल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी मिळण्यासाठी होईल. पर्यायाने शेतीचा चांगल्या प्रकारे विकास होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरघोस वाढ होईल, असा विश्वासही लोणीकर यांनी व्यक्त केला.