शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

चंद्रभागेवरील पूल उभारणीसाठी आंदोलन उभारू

By admin | Updated: July 20, 2015 00:52 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद पालखी सोहळा पंढरपूरला जाताना होळे ते कवठाळे येथून चंद्रभागा पार करून जावे लागते. मागील वर्षी याच ठिकाणी अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

विशाल सोनटक्के , उस्मानाबादपालखी सोहळा पंढरपूरला जाताना होळे ते कवठाळे येथून चंद्रभागा पार करून जावे लागते. मागील वर्षी याच ठिकाणी अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शासनाने येथे पूल बांधण्यास मंजुरी दिली होती. मात्र, वर्ष उलटले तरी पुलाचे काम सुरू झालेले नाही. हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत या पूल उभारणीसाठी दिंडीवाल्यांशी चर्चा करून आंदोलनाबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रमुख रघुनाथ नारायणबुवा गोसावी यांनी दिली. श्री क्षेत्र पैठण ते श्री क्षेत्र पंढरपूर निघालेल्या एकनाथ महाराजांच्या पालखीचे रविवारी सायंकाळी परंड्यात आगमन झाले. येथील देशमुख वाड्यावर या पालखीचा मुक्काम आहे. याप्रसंगी ते बोलत होते. सर्वात पुरातन पालखी सोहळा म्हणून या दिंडीची ओळख आहे. पूर्वी डोक्यावर पादुका घेऊन निघणारी ही पालखी जानकीबार्इंनी सुरू केली. ८ जुलै रोजी अधिव वद्य सप्तमीला पैठणहून निघालेल्या या पालखीची श्री क्षेत्र पंढरपूरदरम्यान चार ठिकाणी रिंगण होतात. यामध्ये मेडसिंगे, पारगाव घुमरे, नांगर डोह आणि कवेदंड या चार ठिकाणांचा समावेश आहे. एकनाथ महाराजांच्या रथापुढे पाच आणि रथामागे १७ दिंड्या सहभागी असून, साधारण प्रत्येक दिंडीत पाचशेजणांचा समावेश आहे. याबरोबरच पालखी मार्गावर गावोगावचे भाविक दिंडीमध्ये सहभागी होत असून, सद्यस्थितीत पालखीत पंधरा हजाराहून अधिक वारकऱ्यांचा समावेश असल्याचे गोसावी महाराज यांनी सांगितले. राज्य शासनाने खास पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्ग उभारले आहेत. मात्र, या पालखी मार्गाची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने याचा वारकऱ्यांना त्रास सोसावा लागत असल्याचे ते म्हणाले. खर्डा-तिंत्रज आणि तिंत्रज-देवगाव हा रस्ता काहीसा बरा आहे. मात्र, त्यापुढील रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वागताला शासन स्वत: जाते. मात्र, नाथ महाराजांच्या पालखीचा यथोचित सन्मान होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात मानाच्या सात पालख्या आहेत. यात एकनाथ महाराजांच्या पालखीला तिसऱ्या क्रमांकाचा मान आहे. पंढरपूरमध्ये पालख्या गेल्यानंतर या पालख्यांचा काला गोपाळपूरमध्ये होतो. मात्र, नाथ महाराजांच्या पालखीचा काला मंदिरात होतो. असे या पालखीचे महत्त्व असतानाही सोहळ्यातील वारकऱ्यांना दर्जेदार सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पैठणहून निघाल्यापासूनच या पालखीची व्यथा सुरू होते. पालखीचा पहिला मुक्काम कनकवाडी येथे असतो. मात्र, या पहिल्या मुक्कामाला जाण्यासाठी रस्ता नाही. पालखी सोहळ्याला नदी पार कडून कनकवाडी गाठावी लागते. शासनाने काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील पालखी मार्गासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या मार्गावर सर्वात खडतर मार्ग म्हणून ओळख असलेल्या राक्षसभुवन ते रायमोह आणि रायमोह ते गारमाथा या मार्गाचा समावेश केलेला नाही. अत्यंत डोंगराळ भाग असलेल्या या रस्त्यावर वारकऱ्यांचे मोठे हाल होतात. मात्र, त्यानंतरही हा रस्ता पालखी मार्गामध्ये समाविष्ट केलेला नसल्याचे ते म्हणाले. मराठवाड्यातील सर्वात मोठी पालखी म्हणून ओळख असलेल्या या सोहळ्यासाठी शासनाने खास सोई-सुविधा पुरविण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. १५ हजाराहून अधिक वारकऱ्यांचा समावेश असलेल्या या दिंडीसाठी आज केवळ पाण्याचा एक टँकर आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी तीव्र स्वरूपाची पाणीटंचाई आहे. अशा स्थितीत टँकरची संख्या वाढविणे आवश्यक होते. मात्र त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला. याबरोबरच पालखी सोहळ्यासोबत अवघी एक रुग्णवाहिका असून, त्यातही वैैद्यकीय अधिकारी नाही. त्यामुळे एखादा वारकरी आजारी पडल्यास अथवा त्याला तातडीच्या उपचाराची निकड भासल्यास जवळच्या रुग्णालयात घेऊन जावे लागते. प्रशासनाने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सुसज्ज रुग्णवाहिका सोबत देण्याची गरजही गोसावी महाराज यांनी यावेळी व्यक्त केली.