शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
3
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
4
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
5
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
6
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
7
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
8
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
9
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
10
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
11
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
12
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
13
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
14
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
15
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
16
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
17
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
18
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
19
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
20
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'

निवृत्तीवेतनापासून वंचित कर्मचाऱ्यास खंडपीठात दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST

औरंगाबाद : २०१८ साली निवृत्त झालेले याचिकाकर्ता मनोहर रामचंद्र कुसय्या कोरवी यांना ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी निवृत्तीवेतन आणि थकीत ...

औरंगाबाद : २०१८ साली निवृत्त झालेले याचिकाकर्ता मनोहर रामचंद्र कुसय्या कोरवी यांना ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी निवृत्तीवेतन आणि थकीत इतर अनुषंगिक लाभ देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अविनाश जी. घारोटे यांनी प्रतिवाद्यांना दिला आहे. वरील निर्धारित वेळेत याचिकाकर्त्यास आदेशानुसार लाभ दिले नाही तर देय रकमेवर ६ टक्के वार्षिक दराने व्याज द्यावे लागेल, असे आदेशात म्हटले आहे.

मन्नेरवारलु जमातीचे असलेले याचिकाकर्ता कोरवी यांनी त्यांच्या जातीचे वैधता प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे त्यांचे निवृत्तीवेतन व इतर अनुषंगिक लाभ रोखल्यामुळे त्यांनी ॲड. डी. आर. ईराळे पाटील यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याची नियुक्ती आरक्षित पदावर झाली नव्हती. शिवाय शिपाई म्हणून नियुक्त झालेले कोरवी त्याच पदावरून निवृत्त झाले होते, तसेच सेवा काळात त्यांनी त्यांच्या जातीच्या अनुषंगाने आरक्षणाचे कोणतेही लाभ घेतले नव्हते. असे असताना जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याच्या कारणावरून त्यांचे निवृत्तीवेतन रोखले होते, असे ॲड. ईराळे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले असता, खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.