शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

साथ रोगाचा जिल्ह्याला विळखा

By admin | Updated: August 28, 2014 01:40 IST

लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून हिवतापाचे २० रुग्ण आढळले. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ चिकुनगुनियाचे ५ रुग्ण तर डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले असून, यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़

लातूर : जिल्ह्यात जून महिन्यापासून हिवतापाचे २० रुग्ण आढळले. यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे़ चिकुनगुनियाचे ५ रुग्ण तर डेंग्यूचे २४ रुग्ण आढळले असून, यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ आॅगस्ट महिन्यात १० रुग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह आले आहेत़ अजून ३० रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी गुरुवारी पाठवण्यात येणार आहेत़ हिवताप, चिकुनगुन्या, डेंग्यूच्या साथरोगाने त्रस्त झाले असून या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ लातूर जिल्हात जून महिन्यापासून ते सद्य:स्थितीत हिवताप, चिकुनगुनिया, डेंग्यूच्या साथरोगाने नागरिक हैराण झाले आहेत़ लातूर महानगरपालिका नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात सपशेल अपयशी ठरत आहे़ शहरात कचरा व घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ त्याचा परिणाम म्हणून शहरात साथरोग प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे़ तापीचे लक्ष्मी कॉलनी ११ रुग्ण तर गाजीपुरा भागात ९ रुग्ण असे २० रुग्ण आढळून आले. त्यातील २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे़ ग्रामीण भागातही तापीचे १४ रुग्ण आढळून आले आहेत़ चिकुनगुन्याचे बन सावरगाव येथील ११ तापाचे रुग्ण आढळून आले़ अकराही रुग्णांच्या रक्तजल नमुन्याची तपासणी सेंटिनल सेंटर नांदेड येथे तपासणीसाठी पाठवले असता़, त्यापैकी ५ रुग्ण चिकुनगुनिया दूषित आढळून आले़ हे ५ ही रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत़ जून महिन्यात ४० रक्तजल नमूने तपासणीसाठी पाठवले असता त्यात ६ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले़ जुलै महिन्यात ४५ संशयीत रुग्णाचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील ८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले़ आॅगस्ट महिन्यात २२ संशयीत रुग्णाचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवले असता त्यातील १० रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आले़ दुसऱ्या लॉटमध्ये ३० संशयित रुग्णांचे रक्तजल नमूने तपसणीसाठी गुरुवारी पाठवण्यात येणार आहेत़ १० रुग्णांना डेंग्यूची लागण झालेली आहे़ त्यातील ८ रुग्ण शहरातील असून २ रुग्ण हे ग्रागीण भागातील म्हाडा कॉलनी व शंकरवाडी येथील आहेत़ डेंग्यूची रुग्ण संख्या शहरात झपाट्याने वाढत असून गुरुवारी अजून ३० डेंग्यू संशयीत रुग्णांची रक्तजल नमुने तपसणीसाठी पाठवण्यात येणार आहेत़ त्याचा अहवाल आल्यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होवू शकते़ या साथ रोगांनी शहरातील व जिल्ह्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत़ रुग्णसंख्येत होणारी वाढ पहाता साथ रोग नियंत्रण विभाग व आरोग्य विभागाची अकार्यक्षमता दिसून येत आहे़ (प्रतिनिधी)