शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

काँग्रेस मंथनात; भाजपाची मोर्चेबांधणी

By admin | Updated: May 24, 2014 01:36 IST

रमेश कोतवाल, देवणी लोकसभा निवडणुकीत देवणी तालुक्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याने आता पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मंथनात गुंतले आहेत.

रमेश कोतवाल, देवणी लोकसभा निवडणुकीत देवणी तालुक्यातील मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याने आता पक्षाचे स्थानिक नेते व कार्यकर्ते मंथनात गुंतले आहेत. तर प्रारंभीपासूनच भाजपाला मानणारा मतदार या भागात असला, तरी मोठे मताधिक्य यावेळी मिळाल्याने भाजपाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देवणी तालुक्यात ४८ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ४५ ग्रामपंचायती व ३५ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांपैकी ३० सोसायट्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन जागा आहेत. त्या तिन्ही जागा काँग्रेसकडेच आहेत. पंचायत समितीही काँग्रेसच्याच ताब्यात असताना लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत देवणी तालुका हा भाजपाच्या बाजूने अधिक असतो. जिल्ह्यातील मातब्बर पुढार्‍यांमध्ये देवणी तालुक्यातील काही पुढार्‍यांचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण ६० गावांपैकी फक्त गुरनाळ व आंबा नगर या दोनच गावांतून काँग्रेसला किरकोळ आघाडी मिळाली आहे. इतर सर्व गावांत शेकडो मतांनी भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. मोदी लाटेचा परिणाम देवणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिवाय, काँग्रेसच्या नेत्यांनी मतदारांपर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचविण्यात हयगय केल्यामुळे बहुतांश गावांत पिछेहाट झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सत्तेत असलेल्या या पुढार्‍यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांचे वजन घटल्याने ते कसे वाढविता येईल, यावर विचारमंथन केले जात आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये फारसे बहुमत नसलेल्या भाजपाच्या नेत्यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी मतदारांनी वाजविलेली ही धोक्याची घंटा आगामी निवडणुकीत काय परिणाम करणार, याविषयाच्या चर्चाही तालुक्यात रंगल्या आहेत. तालुक्यातील सर्वच काँग्रेस पुढार्‍यांच्या गावातून यावेळी प्रथमच भाजपाला मताधिक्य मिळाले आहे. डोंगरेवाडी येथे तर काँग्रेसला फक्त ८ मते मिळाली आहेत. एकंदरित, पराभवाने खचलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मंथन सुरू केले असून, मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचे काम करण्यासाठी ते कामाला लागले आहेत. बहुतांश पुढार्‍यांनी गावात नमस्कार वाढविला असल्याचे चित्र तालुक्यात निर्माण झाले आहे. नुसती आश्वासने देऊन मते घेणार्‍या पुढार्‍यांना झटका बसल्याने आता सत्ताधारी पक्षातील सर्वच पुढारी कामाला लागले आहेत.