शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांनी दोन तालुक्यांत काढला कागदोपत्री विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत सुमारे १ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा कागदोपत्री काढण्यात आल्याप्रकरणी राज्यमंत्री ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत सुमारे १ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा कागदोपत्री काढण्यात आल्याप्रकरणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पुरावे सादर करून चौकशीची मागणी केली आहे. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी सरकारचा मंत्री असलो तरी माझ्या विभागाचे तहसीलदार व यंत्रणा आणि तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. मंत्री म्हणून हे माझेदेखील अपयश असल्याचे सांगून राज्यमंत्री सत्तार म्हणाले, ढेकणाप्रमाणे विमा कंपन्या शेतकऱ्यांचे रक्त पित आहेत. सर्वांत अगोदर ज्यांच्या विमापत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. त्यात तहसीलदार, विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कारवाई केली नाही तर मी शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरेल. कोरोनाच्या संकटाचा यंत्रणेने फायदा घेतला आहे. ग्रामसभा नाही, पाहणी नाही. सगळे काही कागदावरच आहे. माझ्या मतदारसंघात हा सगळा प्रकार झाल्यामुळे माझेदेखील हे अपयशच आहे. कृषी अधिकारी, कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी ही सगळीच यंत्रणा यामध्ये दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला.

एकाच तारखेवर नोंदणी केल्याचे पुरावे कृषिमंत्र्यांना दिले आहेत. आठ दिवसांच्या आत कृषी सचिव आणि आयुक्तांची उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशी केली जाईल. आठ दिवसांत न्याय मिळाला नाहीतर, संतप्त शेतकरी आंदोलन करण्याची तयारी करतील. तसेच याचिका दाखल करण्याची तयारीदेखील शेतकरी करीत आहेत. तहसीलदारांसह त्याच्या यंत्रणेवर गुन्हा दाखल केला पाहिजे.

कंपन्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे

एक लाख शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवले आहे. सर्वांत कमी पीक उत्पादन झालेले असताना २६० टक्के वाढ दाखविली आहे. सरकारचा मंत्री असलो तरी माझा आरोप आहे, पीकविमा कंपन्यांची नार्काे टेस्ट झाली पाहिजे. कोरोनाच्या संकटाचा फायदा पीकविमा कंपन्यांनी घेतला. राज्यातील शेतकऱ्यांची इमानदारीने भरपाई केली असती तर प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार नुकसानापोटी मिळाले असते. ४२ टक्के आनेवारी आणि उत्पन्न २६० टक्के दाखविण्यात आले आहे. याची सखोल चौकशीची मागणी सत्तार यांनी केली.