शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांनी दोन तालुक्यांत काढला कागदोपत्री विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत सुमारे १ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा कागदोपत्री काढण्यात आल्याप्रकरणी राज्यमंत्री ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत सुमारे १ लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा कागदोपत्री काढण्यात आल्याप्रकरणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे पुरावे सादर करून चौकशीची मागणी केली आहे. रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी सरकारचा मंत्री असलो तरी माझ्या विभागाचे तहसीलदार व यंत्रणा आणि तालुका कृषी अधिकारी जबाबदार आहेत. मंत्री म्हणून हे माझेदेखील अपयश असल्याचे सांगून राज्यमंत्री सत्तार म्हणाले, ढेकणाप्रमाणे विमा कंपन्या शेतकऱ्यांचे रक्त पित आहेत. सर्वांत अगोदर ज्यांच्या विमापत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. त्यात तहसीलदार, विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कारवाई केली नाही तर मी शिवसैनिक म्हणून रस्त्यावर उतरेल. कोरोनाच्या संकटाचा यंत्रणेने फायदा घेतला आहे. ग्रामसभा नाही, पाहणी नाही. सगळे काही कागदावरच आहे. माझ्या मतदारसंघात हा सगळा प्रकार झाल्यामुळे माझेदेखील हे अपयशच आहे. कृषी अधिकारी, कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदार, तलाठी ही सगळीच यंत्रणा यामध्ये दोषी असल्याचा आरोप त्यांनी केला.

एकाच तारखेवर नोंदणी केल्याचे पुरावे कृषिमंत्र्यांना दिले आहेत. आठ दिवसांच्या आत कृषी सचिव आणि आयुक्तांची उच्चस्तरीय समिती गठित करून चौकशी केली जाईल. आठ दिवसांत न्याय मिळाला नाहीतर, संतप्त शेतकरी आंदोलन करण्याची तयारी करतील. तसेच याचिका दाखल करण्याची तयारीदेखील शेतकरी करीत आहेत. तहसीलदारांसह त्याच्या यंत्रणेवर गुन्हा दाखल केला पाहिजे.

कंपन्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे

एक लाख शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवले आहे. सर्वांत कमी पीक उत्पादन झालेले असताना २६० टक्के वाढ दाखविली आहे. सरकारचा मंत्री असलो तरी माझा आरोप आहे, पीकविमा कंपन्यांची नार्काे टेस्ट झाली पाहिजे. कोरोनाच्या संकटाचा फायदा पीकविमा कंपन्यांनी घेतला. राज्यातील शेतकऱ्यांची इमानदारीने भरपाई केली असती तर प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार नुकसानापोटी मिळाले असते. ४२ टक्के आनेवारी आणि उत्पन्न २६० टक्के दाखविण्यात आले आहे. याची सखोल चौकशीची मागणी सत्तार यांनी केली.