शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

प्रशासकीय यंत्रणेमुळे सामान्यांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:05 IST

भाजपचा आरोप : मालमत्ताकर, महावितरण वीज बिल वसुली थांबवावी औरंगाबाद : प्रशासकीय यंत्रणेतील बेबनावामुळे कोरोना संसर्ग नियंत्रित होत नसल्याचा ...

भाजपचा आरोप : मालमत्ताकर, महावितरण वीज बिल वसुली थांबवावी

औरंगाबाद : प्रशासकीय यंत्रणेतील बेबनावामुळे कोरोना संसर्ग नियंत्रित होत नसल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. महापालिका मालमत्ताकरासाठी मालमत्ता सील करीत आहे. महावितरण कंपनी सक्तीने वीज बिल वसुली करीत आहे. अनेकांच्या घरांचे कनेकश्न तोडण्यात येत आहे. हा सगळा प्रकार थांबविण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

करापोटी वेळेत धनादेश देऊनही महापालिका नागरिकांना कायदेशीर नोटिसा बजावून छळ करत आहेत, असा आरोप माजी उपमहापौर प्रमोद राठोड, समीर राजूरकर यांनी केला.

पाणीपट्टी, मालमत्ता करापोटी वेळेत धनादेश देण्यात आला. धनादेश बँकेत सादर झालेला नसताना वकिलामार्फत १३८ ची नोटीस संबंधित करदात्याच्या घरी पाठवली आहे. हा प्रामाणिक कर भरणाऱ्या नागरिकांना छळण्याचा प्रकार असल्याचे राजूरकर म्हणाले. गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट आहे. असे असताना मनपा मालमत्ता, पाणीपट्टी वसुलीसाठी सक्ती करत आहे. नागरिक मित्र पथकाकडून शहानिशा न करता छोटे-मोठे व्यापारी, विक्रेते यांच्यावर सक्तीने दंडात्मक कारवाई केली जात आहे. दुसरीकडे वीज बिल वसुलीसाठी वीज वितरण कंपनी तगादा लावत असून, वीज तोडली आहे. याप्रसंगी माजी महापौर भगवान घडमोडे, शहर सरचिटणीस राजेश मेहता, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, प्रा. राम बुधवंत उपस्थित होते.

पालकमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान ठिय्या

कोरोनाबाधितांची वाढती संख्या, उपाय-योजना विषयावर चर्चेसाठी भाजप लोकप्रतिनिधींनी प्रशासनाकडे वेळ मागितला. मात्र, त्यांना अद्यापही वेळ दिला नाही, असे केणेकर म्हणाले. दरम्यान, भाजप शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान ठिय्या आंदोलनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचे आंदोलन मोडीत काढले. पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला बोलावून त्यांचे निवेदन घेतले.