शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वखुशीने करतोय आत्महत्या, कुटुंबाला त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:02 IST

भराडी : ‘स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी’ अशी चिठ्ठी लिहून भराडी येथील ...

भराडी : ‘स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलिसांनी सुरक्षा द्यावी’ अशी चिठ्ठी लिहून भराडी येथील भुसार व्यापारी काकासाहेब भिका भागवत (४८) यांनी आपले आयुष्य संपवले. डोईफोडा शिवारातील गट क्रमांक ६१मधील एका झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या हृद्यद्रावक घटनेने भराडी गावात शोककळा पसरली आहे. काकासाहेब यांच्यावर बॅंकेचे कर्ज असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असे जवळच्या नातेवाईकांकडून सांगितले जात आहे.

काकासाहेब भिका भागवत यांचा भराडी येथे भुसाराचा व्यवसाय आहे. शुक्रवारी ते नेहमीप्रमाणे दुकानातून घरी आले. कुटुंबियांसोबत जेवण झाल्यानंतर ते रात्री झोपले. सकाळ‌ी घरातील सर्वजण उठल्यानंतर काकासाहेब घरात नसल्याचे दिसले. त्यामुळे मुलगा रोहितने दुकान, गोदामावर जाऊन शोध घेतला, तिथेही ते न आढळल्याने रोहितने शेतात जाऊन पाहिले असता, लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला वडील दिसले. रोहितने काका पंढरी भागवत यांना ही घटना सांगितली. पोलीस पाटलांसह गावातील लोकांनी घटनास्थळी येत पोलीस पाटलांच्या समक्ष काकासाहेब यांना सिल्लोड उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सिल्लोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार जाधव, संदीप कोथलकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. जवळील नातेवाईकांची चौकशी बाकी आहे. सिल्लोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी साडेबारा वाजता काकासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास बीट जमादार जाधव, संदीप कोथलकर करत आहेत.

खिशात सापडली चिठ्ठी

पोलिसांनी सांगितले की, काकासाहेब भागवत यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली आहे. त्यात काकासाहेब यांनी म्हटले आहे की, ‘मी स्वखुशीने आत्महत्या करत असून, माझ्या कुटुंबाला कुठलाही त्रास झाल्यास पोलीस सरंक्षण देतील’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

खासगी बॅंकेचे कर्ज असल्याची चर्चा

काकासाहेब यांच्यावर खासगी बॅंकेबरोबरच पतसंस्थेचे कर्ज असल्याचे काही नातेवाईकांनी सांगितले. शेतीबरोबरच भुसार मालाचे व्यापारी म्हणून त्यांची गावात ओळ‌ख होती. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळूनच काकासाहेब भागवत यांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्यांच्या नातेवाईकांकडून म्हटले जात आहे.