बीड : जिल्हा परिषदेत झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांत घोटाळा झाल्याचा संशय असून खातरजमा करण्यासाठी आता चौकशी समिती नियुक्त केली जाणार आहे. जिल्ह्यात सहा महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात आंतरजिल्हा बदल्या झाल्या होत्या. आधीच अतिरिक्त शिक्षक असताना आंतरजिल्हा बदलीनेही शेकडो शिक्षक दाखल झाले. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा आकडा आपोआपच फुगला. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना केवळ ना हरकत प्रमाणपत्रांवर रुजू करुन घेतले होते. त्यामुळे काहींनी बनावट कागदपत्राआधारे थेट नियुक्त्या मिळविल्याची शक्यताही नाकरता येत नाही. यासंदर्भातील तक्रारी आल्यावर जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सोमवारी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. समितीचा अहवाल येताच कारवाईची दिशा ठरवू, असे सांगत कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
बदली घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती
By admin | Updated: December 16, 2014 01:06 IST