शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्हाधिकारी म्हणाले... तर लॉकडाऊनची १० मिनिटांत ऑर्डर निघेल,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : ‘लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. १० मिनिटांत ऑर्डर निघेल; परंतु सामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी ...

औरंगाबाद : ‘लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागणार नाही. १० मिनिटांत ऑर्डर निघेल; परंतु सामान्यांना त्रास होऊ नये, यासाठी अंशत: लॉकडाऊन केले आहे. त्यातही नागरिक शिस्त पाळत नसतील, तर मग पर्याय नाही,’ असा गर्भित इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बुधवारी दिला. नागरिकांनी सहकार्य करावे, शासनाने लागू केलेले सर्व नियम पाळावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट तीव्रतेने उसळी घेत आहे. जनसामान्यांच्या रोजीरोटीवर गदा येऊ नये, म्हणून थेट लॉकडाऊनऐवजी अंशत: लॉकडाऊन केले आहे. परंतु रुग्णसंख्या वाढीचा वेग असाच राहिला, कोरोनाची शिस्त नागरिकांनी पाळली नाही तर येणाऱ्या काही दिवसांत पूर्ण लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही, यावर त्यांनी जोर दिला.

जिल्हाधिकारी म्हणाले, अंत्ययात्रांना गर्दी करू नये, फक्त २० नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आदेश असताना गाढेजळगांव परिसरात ५०० हून अधिक नागरिक अंत्ययात्रेत सहभागी होते. करमाड पोलिसांना या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. ग्रामीण भागात काही ठिकाणी विवाह सोहळे होत असल्याची माहिती आली आहे. त्याबाबत शहानिशा करून गुन्हे दाखल करण्यात येतील.

गर्दी करून कार्यक्रम घ्यायचे आणि पुन्हा कोरोना संसर्ग झाल्यावर प्रशासनावर खापर फोडायचे ही पद्धत योग्य नाही. शहरात काही भागांमध्ये कोरोनाची शिस्त पाळली जात नाही. काही लोकप्रतिनिधी पोलिसांशी हुज्जत घालतात. जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा जल्लोष करण्यात आला. हे सगळे ज्यांनी केले, त्यांनीदेखील भान ठेवणे गरजेचे होते. या सगळ्या घटना आपणास लॉकडाऊनकडे घेऊन जात असल्याचे सांगत नांदेड, परभणीमध्ये लॉकडाऊन झाले आहे. औरंगाबादचा रुग्णवाढीत क्रमांक वरचा आला आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

घाटीमध्ये १०० बेड्स वाढविण्यासाठी प्रयत्न

घाटीमध्ये १०० बेड्स वाढविण्यासाठी तयारी केली आहे. ४६ आयसीयूचे बेड्स वाढतील. यासाठी बुधवारी दिवसभर बैठकांचे सत्र झाले. घाटीत सर्व काही तयार आहे, त्यामुळे तेथे बेड्स वाढविणे सोपे जाणार आहे. बरीचशी व्यवस्था केली आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.