शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

लग्नसमारंभासाठी आचारसंहिता जाहीर

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

औरंगाबाद : लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावावे, सुरुची भोजनात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत व विवाहादरम्यान संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये,

औरंगाबाद : लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावावे, सुरुची भोजनात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत व विवाहादरम्यान संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये, वरातीमध्ये रस्त्यावर तरुणी व महिलांनी नृत्य करू नये, असा निर्णय राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतने घेतला आहे. १ जानेवारी २०१५ पासून ही आचारसंहिता समाजात लागू होणार आहे. खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी यांच्या उपस्थितीत समाजाची एक बैठक घेण्यात आली. यानंतर लग्नसमारंभाची आचारसंहिता जाहीर करण्यात आली. १ जानेवारी २०१५ पासून आचारसंहितेचे पालन व्हावे, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. विवाहपत्रिकेनुसार निर्देशित वेळेवरच विवाह लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुहूर्तापासून ३० मिनिटांच्या आत लग्न लावण्यात आले नाही, तर सर्व सदस्य हात जोडून निघून जातील. जेवणात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत. लग्नसमारंभात संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये, मंगलाष्टकांनासुरुवात झाल्यापासून वधू-वर एकमेकांना हार घालेपर्यंत मध्येच ते थांबवून स्वागत- सत्कार करण्यात येऊ नये, वरातीमध्ये रस्त्यावर तरुणी व महिलांनी नृत्य करू नये इ. अटींचा समावेश करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास समाजबांधव त्या लग्नसोहळ्यात जेवण न करता निघून जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी समितीचे मुख्य संयोजक महावीर पाटणी, विनोद लोहाडे, अशोक अजमेरा, दिलीप कासलीवाल, प्रकाश अजमेरा, दिलीप ठोळे, चांदमल चांदीवाल, किरण पहाडे, एम.आर. बडजाते, डॉ. प्रकाश पापडीवाल यांच्यासह विश्वस्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.