शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

लग्नसमारंभासाठी आचारसंहिता जाहीर

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

औरंगाबाद : लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावावे, सुरुची भोजनात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत व विवाहादरम्यान संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये,

औरंगाबाद : लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावरच लग्न लावावे, सुरुची भोजनात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत व विवाहादरम्यान संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये, वरातीमध्ये रस्त्यावर तरुणी व महिलांनी नृत्य करू नये, असा निर्णय राजाबाजार येथील खंडेलवाल दिगंबर जैन पंचायतने घेतला आहे. १ जानेवारी २०१५ पासून ही आचारसंहिता समाजात लागू होणार आहे. खंडेलवाल दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष ललित पाटणी यांच्या उपस्थितीत समाजाची एक बैठक घेण्यात आली. यानंतर लग्नसमारंभाची आचारसंहिता जाहीर करण्यात आली. १ जानेवारी २०१५ पासून आचारसंहितेचे पालन व्हावे, असा ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला. विवाहपत्रिकेनुसार निर्देशित वेळेवरच विवाह लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मुहूर्तापासून ३० मिनिटांच्या आत लग्न लावण्यात आले नाही, तर सर्व सदस्य हात जोडून निघून जातील. जेवणात १६ पेक्षा अधिक पदार्थ नसावेत. लग्नसमारंभात संगीत रजनीचे आयोजन करण्यात येऊ नये, मंगलाष्टकांनासुरुवात झाल्यापासून वधू-वर एकमेकांना हार घालेपर्यंत मध्येच ते थांबवून स्वागत- सत्कार करण्यात येऊ नये, वरातीमध्ये रस्त्यावर तरुणी व महिलांनी नृत्य करू नये इ. अटींचा समावेश करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास समाजबांधव त्या लग्नसोहळ्यात जेवण न करता निघून जातील, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी समितीचे मुख्य संयोजक महावीर पाटणी, विनोद लोहाडे, अशोक अजमेरा, दिलीप कासलीवाल, प्रकाश अजमेरा, दिलीप ठोळे, चांदमल चांदीवाल, किरण पहाडे, एम.आर. बडजाते, डॉ. प्रकाश पापडीवाल यांच्यासह विश्वस्त व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.