शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

दिवसभर ढग, रात्री टिप्पूर चांदणे

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

विठ्ठल कटके, रेणापूर तालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही

विठ्ठल कटके, रेणापूरतालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. दुबार पेरणी झाली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने गुंगारा दिल्याने उगवलेले सोयाबीन माना टाकू लागले आहे. पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असल्याने तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना तब्बल पंधरा दिवस उशीर झाला. त्यात उडीद-मूग या पिकात मोठी घट झाली. त्याची जागा सोयाबीन पिकाने घेतली. तालुक्यात तब्बल तीस हजार हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा आहे. पेरणीनंतर मध्यंतरी पाऊस न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यात शेकडो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला.२२ जुलैअखेर तालुक्यात रेणापूर विभागात १२८ मि.मी. पानगाव विभागात-१२२ मि.मी., पोहरेगाव विभागात-१७८ मि.मी. तर कारेपूर विभागात १४५ मि.मी. असा एकूण सरासरी १४३ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघाड दिल्याने उगवलेले सोयाबीन व इतर पिके पावसाअभावी माना टाकीत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, त्यात जोराचा वारा तर रात्री टिप्पूर चांदणे पडत आहे़ त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. आठवड्यात जर मोठा पाऊस झाला, तरच पिके हाती लागतील. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हजारो शेतकरी आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.तालुक्यात पोहरेगाव, पळशी, शेरा, निवाडा, सिंधगाव, दर्जी बोरगाव, इंदरठाणा, सांगवी, भोकरंबा, आंदलगाव, लखमापूर, डिगोळ देशमुख आदी भागांत ऊस व इतर खरीप पिकांचे रानडुकरांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उसाची तर मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शिवाय, हरीण व इतर वन्यप्राण्यांचाही पिकांना उपद्रव होत असल्याचे शेतकरी व्यंकटी कातळे, राम मोरे, गंगासिंह कदम, दगडू सावंत, अ‍ॅड. प्रमोद जाधव यांनी सांगितले़गेल्या रबी हंगामात ज्वारीचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे कडबा उपलब्ध नाही. यामुळे हिरवा चारा नाही. त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाला आहे. हिरवा चारा नसल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी जनावरांना पेंड, सोयाबीनची गुळी हेच खाद्य देत आहेत. पशुधनांचे हाल सुरु़़़पावसाची सरासरी अत्यंत कमी झाल्यामुळे यावर्षी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होतो की काय? अशी स्थिती सध्या आहे. अनेक पाझर तलावात अपुरे पाणी आहे़ रेणा धरणात काही अंशी पाणीपातळी वाढली आहे. शिवाय, हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. नद्या-नाल्यांना पाणी नसल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहेत.