शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

दिवसभर ढग, रात्री टिप्पूर चांदणे

By admin | Updated: August 4, 2014 00:52 IST

विठ्ठल कटके, रेणापूर तालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही

विठ्ठल कटके, रेणापूरतालुक्यात उशिरा पाऊस झाल्याने खरीपाच्या पेरण्यांनाही उशीर झाला. कमी-जास्त पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही. दुबार पेरणी झाली. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने गुंगारा दिल्याने उगवलेले सोयाबीन माना टाकू लागले आहे. पिण्याच्या पाण्याचा व चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला असल्याने तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. तालुक्यात यावर्षी उशिरा पाऊस झाला. त्यामुळे खरीपाच्या पेरण्यांना तब्बल पंधरा दिवस उशीर झाला. त्यात उडीद-मूग या पिकात मोठी घट झाली. त्याची जागा सोयाबीन पिकाने घेतली. तालुक्यात तब्बल तीस हजार हेक्टर्सवर सोयाबीनची पेरणी झाली. त्यापाठोपाठ तुरीचा पेरा आहे. पेरणीनंतर मध्यंतरी पाऊस न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. त्यात शेकडो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला.२२ जुलैअखेर तालुक्यात रेणापूर विभागात १२८ मि.मी. पानगाव विभागात-१२२ मि.मी., पोहरेगाव विभागात-१७८ मि.मी. तर कारेपूर विभागात १४५ मि.मी. असा एकूण सरासरी १४३ मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघाड दिल्याने उगवलेले सोयाबीन व इतर पिके पावसाअभावी माना टाकीत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण, त्यात जोराचा वारा तर रात्री टिप्पूर चांदणे पडत आहे़ त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. आठवड्यात जर मोठा पाऊस झाला, तरच पिके हाती लागतील. अन्यथा शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामोरे जावे लागेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हजारो शेतकरी आभाळाकडे टक लावून पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.तालुक्यात पोहरेगाव, पळशी, शेरा, निवाडा, सिंधगाव, दर्जी बोरगाव, इंदरठाणा, सांगवी, भोकरंबा, आंदलगाव, लखमापूर, डिगोळ देशमुख आदी भागांत ऊस व इतर खरीप पिकांचे रानडुकरांपासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उसाची तर मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. शिवाय, हरीण व इतर वन्यप्राण्यांचाही पिकांना उपद्रव होत असल्याचे शेतकरी व्यंकटी कातळे, राम मोरे, गंगासिंह कदम, दगडू सावंत, अ‍ॅड. प्रमोद जाधव यांनी सांगितले़गेल्या रबी हंगामात ज्वारीचे पीक वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांकडे कडबा उपलब्ध नाही. यामुळे हिरवा चारा नाही. त्याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाला आहे. हिरवा चारा नसल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकरी जनावरांना पेंड, सोयाबीनची गुळी हेच खाद्य देत आहेत. पशुधनांचे हाल सुरु़़़पावसाची सरासरी अत्यंत कमी झाल्यामुळे यावर्षी तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होतो की काय? अशी स्थिती सध्या आहे. अनेक पाझर तलावात अपुरे पाणी आहे़ रेणा धरणात काही अंशी पाणीपातळी वाढली आहे. शिवाय, हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध नाही. नद्या-नाल्यांना पाणी नसल्याने जनावरांचे मोठे हाल होत आहेत.