शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बंद महाविद्यालय सुरूकरण्याचा घाट

By admin | Updated: October 9, 2016 01:08 IST

औरंगाबाद : सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय नियमबाह्यरीत्या सुरूकरण्यासाठी विद्यापीठातील यंत्रणा राबत आहे.

औरंगाबाद : सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय नियमबाह्यरीत्या सुरूकरण्यासाठी विद्यापीठातील यंत्रणा राबत आहे. विशेष म्हणजे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वत: या प्रकरणात रस दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २००१ मध्ये सातपुडा विकास मंडळ (ता. रावेर) चे मोहाडी येथे सुरूझालेले वरिष्ठ कला महाविद्यालय २००६-०७ या वर्षी बंद पडले. त्यामुळे विद्यापीठाने याठिकाणी २००६ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात सतत दहा वर्षे नवीन महाविद्यालयाची तरतूद केली. त्यानुसार २८ एप्रिल २०१४ मध्ये ग्रामीण विकास प्रसारक मंडळाच्या पद्मावती कला व विज्ञान महाविद्यालयाला परवानगी मिळून हे महाविद्यालय सुरूझाले. बंद पडलेले वरिष्ठ कला महाविद्यालय सुरूकरण्यासाठी ‘सातपुडा’ संस्थेने आता जून २०१६ पासून महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरूकेले आहेत. प्राप्त माहितीनुसार हे महाविद्यालय सुरूकरण्यासाठी काही मंडळींनी कंत्राटच घेतले आहे. बंद पडलेले महाविद्यालय सुरूकरण्यासंदर्भात संलग्नीकरण समिती नेमण्यास यापूर्वीचे बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी नकार दिला होता. त्यांच्या नकारानंतर कुलगुरूंनी स्वत: हा विषय आपल्या अखत्यारीत घेतला. ८ जून २०१६ ला ‘सातपुडा’ संस्थेने महाविद्यालय पुनर्संलग्नीकरणासाठी अर्ज दाखल केला. मागील पाच वर्षांची संलग्नीकरण फीदेखील एकदाच भरली. विद्यापीठानेही ती नियमबाह्यरीत्या स्वीकारली. त्यानंतर पी. पी. कलावंत यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने १७ जून २०१६ रोजी संलग्नीकरण समिती नेमली. त्यांनी बीसीयूडी संचालकांना डावलून उपकुलसचिव पी. पी. कलावंत यांच्या सहीने संलग्नीकरणाची पत्रे तयार करून ती ‘सातपुडा’ संस्थेला धाडली आहेत. बीसीयूडींचा अधिकार याठिकाणी कुलगुरूव उपकुलसचिवांनी बेकायदेशीररीत्या वापरल्याचे स्पष्ट होत आहे. संलग्नीकरण समितीत नेमलेली नावे लक्षात घेतल्यानंतर विद्यापीठ आणि कुलगुरूकोणत्या पद्धतीने काम करीत आहेत, याचे दर्शन होते. या समितीने आपला अहवाल दिला आहे. मात्र, सध्याचे बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील म्हणाले की, अशी कोणतीही समिती गेलेली नाही. एक समिती जूनमध्ये नेमल्यानंतर आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये कुलगरूंनी समिती नेमण्याचे कारण काय ते स्पष्ट होत नाही.