शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बंद महाविद्यालय सुरूकरण्याचा घाट

By admin | Updated: October 9, 2016 01:08 IST

औरंगाबाद : सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय नियमबाह्यरीत्या सुरूकरण्यासाठी विद्यापीठातील यंत्रणा राबत आहे.

औरंगाबाद : सुमारे दहा वर्षांपूर्वी बंद पडलेले मोहाडी (ता. कन्नड) येथील महाविद्यालय नियमबाह्यरीत्या सुरूकरण्यासाठी विद्यापीठातील यंत्रणा राबत आहे. विशेष म्हणजे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी स्वत: या प्रकरणात रस दाखविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. २००१ मध्ये सातपुडा विकास मंडळ (ता. रावेर) चे मोहाडी येथे सुरूझालेले वरिष्ठ कला महाविद्यालय २००६-०७ या वर्षी बंद पडले. त्यामुळे विद्यापीठाने याठिकाणी २००६ ते २०११ आणि २०११ ते २०१६ च्या बृहत आराखड्यात सतत दहा वर्षे नवीन महाविद्यालयाची तरतूद केली. त्यानुसार २८ एप्रिल २०१४ मध्ये ग्रामीण विकास प्रसारक मंडळाच्या पद्मावती कला व विज्ञान महाविद्यालयाला परवानगी मिळून हे महाविद्यालय सुरूझाले. बंद पडलेले वरिष्ठ कला महाविद्यालय सुरूकरण्यासाठी ‘सातपुडा’ संस्थेने आता जून २०१६ पासून महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरूकेले आहेत. प्राप्त माहितीनुसार हे महाविद्यालय सुरूकरण्यासाठी काही मंडळींनी कंत्राटच घेतले आहे. बंद पडलेले महाविद्यालय सुरूकरण्यासंदर्भात संलग्नीकरण समिती नेमण्यास यापूर्वीचे बीसीयूडी संचालक डॉ. के. व्ही. काळे यांनी नकार दिला होता. त्यांच्या नकारानंतर कुलगुरूंनी स्वत: हा विषय आपल्या अखत्यारीत घेतला. ८ जून २०१६ ला ‘सातपुडा’ संस्थेने महाविद्यालय पुनर्संलग्नीकरणासाठी अर्ज दाखल केला. मागील पाच वर्षांची संलग्नीकरण फीदेखील एकदाच भरली. विद्यापीठानेही ती नियमबाह्यरीत्या स्वीकारली. त्यानंतर पी. पी. कलावंत यांनी स्वत:च्या स्वाक्षरीने १७ जून २०१६ रोजी संलग्नीकरण समिती नेमली. त्यांनी बीसीयूडी संचालकांना डावलून उपकुलसचिव पी. पी. कलावंत यांच्या सहीने संलग्नीकरणाची पत्रे तयार करून ती ‘सातपुडा’ संस्थेला धाडली आहेत. बीसीयूडींचा अधिकार याठिकाणी कुलगुरूव उपकुलसचिवांनी बेकायदेशीररीत्या वापरल्याचे स्पष्ट होत आहे. संलग्नीकरण समितीत नेमलेली नावे लक्षात घेतल्यानंतर विद्यापीठ आणि कुलगुरूकोणत्या पद्धतीने काम करीत आहेत, याचे दर्शन होते. या समितीने आपला अहवाल दिला आहे. मात्र, सध्याचे बीसीयूडी संचालक डॉ. सतीश पाटील म्हणाले की, अशी कोणतीही समिती गेलेली नाही. एक समिती जूनमध्ये नेमल्यानंतर आणि त्या समितीने अहवाल दिल्यानंतर पुन्हा सप्टेंबरमध्ये कुलगरूंनी समिती नेमण्याचे कारण काय ते स्पष्ट होत नाही.