शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

घट्ट मैत्रीला लागली काळाची दृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:25 IST

मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तिसरा मृत तरुण हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. बजाजनगरातील मृत तरुण अविनाश गव्हाणे यांच्या पार्थिवावर बजाजनगरात आणि नारायण थोरात याच्या पार्थिवावर गाजगाव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अविनाशचा विवाह २५ नोव्हेंबरला ठरला होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे बजाजनगरात हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईहून नाशिकमार्गे औरंगाबादकडे येत असताना येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे ट्रक, मारुती कार व व्हर्ना कार या तिहेरी अपघातात अविनाश गव्हाणे, नारायण थोरात, हर्षल घोलप या तिघांचा मृत्यू झाला. तर गौरव प्रजापती व उमेश भगत हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच बजाजनगरातील या तरुणाचे नातेवाईक व शेकडो कार्यकर्ते घटनास्थळाकडे रवाना झाले होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वाळूज महानगरात शोककळा पसरली. सोशल मीडियामधून या अपघाताच्या माहितीची दिवसभर देवाण-घेवाण सुरू होती.मराठा मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी वाळूज महानगर परिसरातील अविनाश गव्हाणे (२२, रा. बजाजनगर), नारायण थोरात (रा. गाजगाव), गौरव प्रजापती व उमेश भगत (दोघेही रा. सिडको वाळूज महानगर) असे चौघे जण कारने (क्र. एमएच-२०, ईएफ- ७२६४) बजाजनगरातून अहमदनगरमार्गे मुंबईकडे निघाले होते. या चौघांचा मित्र हर्षल घोलप (रा. संगमनेर) याला त्यांनी पुण्यातून सोबत घेतले होते.लग्नापूर्वीच काळाने घातला घालामृत अविनाश नवनाथ गव्हाणे (२२) याचे कुटुंब मूळचे वेलतुरी (ता.आष्टी जि.बीड) येथील रहिवासी असून, गव्हाणे कुटुंब २५ वर्षांपूर्वी बजाजनगरात आले होते. अविनाशचे आई-वडील बजाजनगरात किराणा दुकान चालवतात. तर अविनाश याने पुणे येथील डी. वाय. महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या अविनाशने काही दिवसांपूर्वी मोबाईल कंपनीची डीलरशिप घेतली होती. दोन महिन्यांपूर्वीच अविनाशचा साखरपुडा शेवगाव तालुक्यातील शिकारे नांदूर गावातील तरुणीशी थाटामाटात पार पडला होता. २५ नोव्हेंबर ही विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच अविनाशवर काळाने घाला घातल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.