शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

घट्ट मैत्रीला लागली काळाची दृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:25 IST

मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : मुंबईत मराठा मोर्चात सामील झाल्यानंतर घरी परतणाºया समाजबांधवाच्या कारला झालेल्या अपघातात वाळूज महानगरातील दोन तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले. तिसरा मृत तरुण हा अहमदनगर जिल्ह्यातील आहे. बजाजनगरातील मृत तरुण अविनाश गव्हाणे यांच्या पार्थिवावर बजाजनगरात आणि नारायण थोरात याच्या पार्थिवावर गाजगाव येथे गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत अविनाशचा विवाह २५ नोव्हेंबरला ठरला होता. मात्र त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातल्यामुळे बजाजनगरात हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईहून नाशिकमार्गे औरंगाबादकडे येत असताना येवला तालुक्यातील खामगाव पाटी येथे ट्रक, मारुती कार व व्हर्ना कार या तिहेरी अपघातात अविनाश गव्हाणे, नारायण थोरात, हर्षल घोलप या तिघांचा मृत्यू झाला. तर गौरव प्रजापती व उमेश भगत हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींवर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची माहिती मिळताच बजाजनगरातील या तरुणाचे नातेवाईक व शेकडो कार्यकर्ते घटनास्थळाकडे रवाना झाले होते. या भीषण अपघाताची माहिती मिळताच वाळूज महानगरात शोककळा पसरली. सोशल मीडियामधून या अपघाताच्या माहितीची दिवसभर देवाण-घेवाण सुरू होती.मराठा मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी वाळूज महानगर परिसरातील अविनाश गव्हाणे (२२, रा. बजाजनगर), नारायण थोरात (रा. गाजगाव), गौरव प्रजापती व उमेश भगत (दोघेही रा. सिडको वाळूज महानगर) असे चौघे जण कारने (क्र. एमएच-२०, ईएफ- ७२६४) बजाजनगरातून अहमदनगरमार्गे मुंबईकडे निघाले होते. या चौघांचा मित्र हर्षल घोलप (रा. संगमनेर) याला त्यांनी पुण्यातून सोबत घेतले होते.लग्नापूर्वीच काळाने घातला घालामृत अविनाश नवनाथ गव्हाणे (२२) याचे कुटुंब मूळचे वेलतुरी (ता.आष्टी जि.बीड) येथील रहिवासी असून, गव्हाणे कुटुंब २५ वर्षांपूर्वी बजाजनगरात आले होते. अविनाशचे आई-वडील बजाजनगरात किराणा दुकान चालवतात. तर अविनाश याने पुणे येथील डी. वाय. महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. आई-वडिलांना एकुलता एक असलेल्या अविनाशने काही दिवसांपूर्वी मोबाईल कंपनीची डीलरशिप घेतली होती. दोन महिन्यांपूर्वीच अविनाशचा साखरपुडा शेवगाव तालुक्यातील शिकारे नांदूर गावातील तरुणीशी थाटामाटात पार पडला होता. २५ नोव्हेंबर ही विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच अविनाशवर काळाने घाला घातल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.