शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

ऊर्जा विभागाच्या १७ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:23 IST

गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे.नियोजन विभागाच्या माहिती प्रणालीवरील आधीनस्थ असलेल्या ऊर्जा विभागाच्या दोन व महाऊर्जा विभागाच्या १७ योजना या केंद्र शासन पुरस्कृत असल्याने त्यांना केंद्राकडून परस्पर निधी मिळत होता. त्यामुळे राज्य शासनाने या १७ योजनांसाठी गेल्या तीन वर्षात एक रुपयाच्याही निधीची तरतूद केली नाही. त्यामध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, कृषीजन्य अवशेषांवर आधारित वीज निर्मितीसाठी महाऊर्जा विकास अभिकरण सहायक अनुदान, सौरऊर्जा प्रकल्पासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणास सहायक अनुदान, वीज पार्क कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, नवीन सौर शहरासाठी सहायक अनुदान, ग्रामीण विद्युतीकरणासाठी सहाय्यक अनुदान, ग्रामीण वीज सुरक्षा कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, अपारंपारिक ऊर्जा कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसिद्धी व प्रदर्शनासाठी सहायक अनुदान, सौर कंदील कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, बॅटरीवर आधारित वाहन कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, पवन संकरित यंत्राच्या कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, सौर औष्णिक कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, सौर प्रशासकीय कार्यक्रमासाठी अनुदान, वारा परिमापन केंद्र स्थापन्यासाठी अनुदान, जलविद्युत प्रकल्पासाठी सहायक अनुदान, अक्षय ऊर्जा कार्यक्रमासाठी सहायक अनुदान व सुधारित गतिमान विद्युत विकास कार्यक्रमांतर्गत महावितरण कंपनीस कर्ज या योजनांचा समावेश आहे.या योजनांकरिता गेल्या तीन वर्षात एक रुपयाचीही तरतूद केली गेली नसल्याने या योजनाच बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश २१ सप्टेंबर रोजी काढण्यात आले आहेत.