शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

ऊर्जा विभागाच्या १७ योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:23 IST

गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गेल्या तीन वर्षांपासून ऊर्जा विभागाशी संबंधित १७ योजनांसाठी एकाही रुपयाची तरतूद केली गेली नसल्याने या योजना बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने नीती आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतला आहे.नियोजन विभागाच्या माहिती प्रणालीवरील आधीनस्थ असलेल्या ऊर्जा विभागाच्या दोन व महाऊर्जा विभागाच्या १७ योजना या केंद्र शासन पुरस्कृत असल्याने त्यांना केंद्राकडून परस्पर निधी मिळत होता. त्यामुळे राज्य शासनाने या १७ योजनांसाठी गेल्या तीन वर्षात एक रुपयाच्याही निधीची तरतूद केली नाही. त्यामध्ये राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना, कृषीजन्य अवशेषांवर आधारित वीज निर्मितीसाठी महाऊर्जा विकास अभिकरण सहायक अनुदान, सौरऊर्जा प्रकल्पासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणास सहायक अनुदान, वीज पार्क कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, नवीन सौर शहरासाठी सहायक अनुदान, ग्रामीण विद्युतीकरणासाठी सहाय्यक अनुदान, ग्रामीण वीज सुरक्षा कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, अपारंपारिक ऊर्जा कार्यक्रमाच्या प्रचार, प्रसिद्धी व प्रदर्शनासाठी सहायक अनुदान, सौर कंदील कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, बॅटरीवर आधारित वाहन कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, पवन संकरित यंत्राच्या कार्यक्रमासाठी सहाय्यक अनुदान, सौर औष्णिक कार्यक्रमासाठी सहायक अनुदान, सौर प्रशासकीय कार्यक्रमासाठी अनुदान, वारा परिमापन केंद्र स्थापन्यासाठी अनुदान, जलविद्युत प्रकल्पासाठी सहायक अनुदान, अक्षय ऊर्जा कार्यक्रमासाठी सहायक अनुदान व सुधारित गतिमान विद्युत विकास कार्यक्रमांतर्गत महावितरण कंपनीस कर्ज या योजनांचा समावेश आहे.या योजनांकरिता गेल्या तीन वर्षात एक रुपयाचीही तरतूद केली गेली नसल्याने या योजनाच बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या संदर्भातील आदेश २१ सप्टेंबर रोजी काढण्यात आले आहेत.