शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

क्लिनिकल, सेफ्टी ट्रायलने येणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:06 IST

‘दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद ...

‘दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद होईल, तेव्हा कोरोना संपेल’

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : भारतात ज्याही कोरोना लसीला मान्यता मिळेल, ती सगळ्या क्लिनिकल ट्रायल, सेफ्टी ट्रायल आणि इतर सगळ्या गोष्टीतून पास झाल्यानंतर येईल. स्वयंसेवकांवर डोस दिलेले असतील. सर्व प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच लसीला लायसन्स मिळेल. त्यानंतरच लस दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाविषयी विनाकारण भिती बाळगता कामा नये, असे जागतिक आरोग्य संघटनेेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद म्हणाले. लसीकरण प्रशिक्षणदरम्यानचा हा संवाद.

प्रश्न : कोरोनाच्या नव्या विषाणूचा किती धोका आहे?

उत्तर : नवीन बदल झालेला कोरोनाचा विषाणू (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये सापडला आहे. रंगरुप बदलले असले तरी तो अधिक धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. शिवाय महाराष्ट्रात हा नवा विषाणू नाही. त्यामुळे सध्यातरी कोणताही धोका नाही.

प्रश्न : कोरोनाचा दुसरा लोटची किती शक्यता?

उत्तर : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अंदाज, शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यातून पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे. आगामी काळात लसीकरणामुळे फायदा निश्चित होईल. पण दुसरी लाट येईल की नाही, हे सध्या तरी खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.

प्रश्न : कोरोना लसीकरणाविषयी काय सांगता येईल?

उत्तर : ज्यांची नोंदणी होईल, त्यांना टप्प्याटप्प्यानुसार लस दिली जाणार आहे. लसीकरणाविषयी विनाकारण कोणतीही भिती बाळगू नये. कारण सर्व प्रक्रियातून पास झालेली लस येईल. त्यामुळे लस सुरक्षितच राहिल.

प्रश्न : वैद्यकीय क्षेत्रासमोर नवे आव्हान कोणते वाटते?

उत्तर : काेरोना लसीकरण हेच सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रासमोरील नवे आव्हान आहे. लसीकरण कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येत प्रत्येकाला लसीचे दोन डोस द्यावे लागणार आहे. अनुभव आणि तयारी यातून हे आव्हान निश्चितपणे यशस्वीपणे पेलले जाईल. काही अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. त्या दूर करून लोकांना योग्य माहिती, लसीकरणाचे महत्व सांगावे लागेल.

प्रश्न : कोरोना पूर्णपणे कधी संपेल?

उत्तर : कोरोना हा न दिसणारा शत्रू आहे. डोळ्यांनी हा विषाणू दिसत नाही. रुग्णांच्या माध्यमातूनच तो दिसतो. त्यामुळे दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद होईल, तेव्हा कोरोना संपेला, असे म्हणता येईल. तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल.