शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

क्लिनिकल, सेफ्टी ट्रायलने येणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:06 IST

‘दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद ...

‘दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद होईल, तेव्हा कोरोना संपेल’

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : भारतात ज्याही कोरोना लसीला मान्यता मिळेल, ती सगळ्या क्लिनिकल ट्रायल, सेफ्टी ट्रायल आणि इतर सगळ्या गोष्टीतून पास झाल्यानंतर येईल. स्वयंसेवकांवर डोस दिलेले असतील. सर्व प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतरच लसीला लायसन्स मिळेल. त्यानंतरच लस दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाविषयी विनाकारण भिती बाळगता कामा नये, असे जागतिक आरोग्य संघटनेेचे प्रतिनिधी डॉ. मुजीब सय्यद म्हणाले. लसीकरण प्रशिक्षणदरम्यानचा हा संवाद.

प्रश्न : कोरोनाच्या नव्या विषाणूचा किती धोका आहे?

उत्तर : नवीन बदल झालेला कोरोनाचा विषाणू (स्ट्रेन) ब्रिटनमध्ये सापडला आहे. रंगरुप बदलले असले तरी तो अधिक धोकादायक आहे, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. शिवाय महाराष्ट्रात हा नवा विषाणू नाही. त्यामुळे सध्यातरी कोणताही धोका नाही.

प्रश्न : कोरोनाचा दुसरा लोटची किती शक्यता?

उत्तर : कोरोनाच्या दुसर्या लाटेचा अंदाज, शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यातून पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे. आगामी काळात लसीकरणामुळे फायदा निश्चित होईल. पण दुसरी लाट येईल की नाही, हे सध्या तरी खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.

प्रश्न : कोरोना लसीकरणाविषयी काय सांगता येईल?

उत्तर : ज्यांची नोंदणी होईल, त्यांना टप्प्याटप्प्यानुसार लस दिली जाणार आहे. लसीकरणाविषयी विनाकारण कोणतीही भिती बाळगू नये. कारण सर्व प्रक्रियातून पास झालेली लस येईल. त्यामुळे लस सुरक्षितच राहिल.

प्रश्न : वैद्यकीय क्षेत्रासमोर नवे आव्हान कोणते वाटते?

उत्तर : काेरोना लसीकरण हेच सध्या तरी वैद्यकीय क्षेत्रासमोरील नवे आव्हान आहे. लसीकरण कार्यक्रम अधिक चांगल्या पद्धतीने राबविला जाईल. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येत प्रत्येकाला लसीचे दोन डोस द्यावे लागणार आहे. अनुभव आणि तयारी यातून हे आव्हान निश्चितपणे यशस्वीपणे पेलले जाईल. काही अफवा पसरण्याचीही शक्यता आहे. त्या दूर करून लोकांना योग्य माहिती, लसीकरणाचे महत्व सांगावे लागेल.

प्रश्न : कोरोना पूर्णपणे कधी संपेल?

उत्तर : कोरोना हा न दिसणारा शत्रू आहे. डोळ्यांनी हा विषाणू दिसत नाही. रुग्णांच्या माध्यमातूनच तो दिसतो. त्यामुळे दोन ते तीन महिने झाले आणि कुठेच रुग्ण नाही, असे जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत कोरोना राहील. रुग्ण निघणे बंद होईल, तेव्हा कोरोना संपेला, असे म्हणता येईल. तोपर्यंत काळजी घ्यावी लागेल.