शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

‘दानपत्र’च्या जागांवर दावा

By admin | Updated: June 25, 2014 01:26 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी दान मिळालेल्या जमिनींवर जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्र आणि शाळांच्या इमारती बांधल्या असल्या, तरी त्यातील अनेक जागा स्वत:च्या नावावर करून घेतलेल्या नाहीत.

औरंगाबाद : जिल्ह्यात ठिकठिकाणी दान मिळालेल्या जमिनींवर जिल्हा परिषदेने आरोग्य केंद्र आणि शाळांच्या इमारती बांधल्या असल्या, तरी त्यातील अनेक जागा स्वत:च्या नावावर करून घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आता काही जागा जिल्हा परिषदेच्या हातून निघून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत दोन आरोग्य केंद्रांच्या जागा परत देण्याची मागणी मूळ मालकांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे, तर एका ठिकाणी शाळेच्या इमारतीचाच ताबा घेण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा आणि आरोग्य केंद्रांसाठी स्थानिक नागरिकांकडून तसेच ग्रामपंचायतींकडून जागा दानपत्र करून घेण्यात आलेल्या आहेत. सध्या या जागांवर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि शाळांच्या इमारती उभ्या आहेत. मात्र, यातील अनेक जागा स्वत:च्या नावावर करून घेण्याची काळजी प्रशासनाने घेतलेली नाही. अलीकडच्या काळात जागांच्या किमती वाढल्यामुळे आणि संबंधित जागा अजूनही मूळ मालकाच्या नावावर असल्यामुळे दानशूर पुत्रांनी त्यावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला सिल्लोड तालुक्यातील लिहा येथील एका शाळेची इमारत मूळ मालकाने ताब्यात घेतली होती. त्यानंतर पिंप्र्रीराजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरही मूळ मालकाने दावा सांगितला आहे. आता लाडसावंगी येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर मूळ मालकाच्या वारसांकडून दावा सांगितला गेला आहे. विशेष म्हणजे या जागांचे दानपत्रही जिल्हा परिषद प्रशासनाकडे उपलब्ध नाहीत. जिल्हा परिषद कार्यालयातून दानपत्रांचे रेकॉर्डही गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता या जागा हातून निघून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. (लोकमत ब्युरो)प्रशासन हलेनास्थायी समितीच्या बैठकीत महिनाभरापूर्वी लिहा येथील शाळेचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या जागांचे रेकॉर्ड तपासण्याच्या सूचना दिल्या, तसेच ज्या जागा अद्याप नावावर झालेल्या नसतील त्या नावावर करून घेण्याची कार्यवाही सुरू करावी, असेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. महिना उलटला तरी गंभीर विषयावर प्रशासनाने कार्यवाही सुरू केलेली नाही. अजूनही रेकॉर्डची शोधाशोध करण्याचेच काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.