शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

धुक्याच्या दुलईत लपेटले शहर

By admin | Updated: January 3, 2015 00:17 IST

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे वातावरण बदलल्याने शुक्रवारी पहाटेपासून संपूर्ण शहर धुक्यात हरवले. अगदी सकाळी ११ वाजेपर्यंत अनेक भागांत धुके कायम होते.

औरंगाबाद : अवकाळी पावसामुळे वातावरण बदलल्याने शुक्रवारी पहाटेपासून संपूर्ण शहर धुक्यात हरवले. अगदी सकाळी ११ वाजेपर्यंत अनेक भागांत धुके कायम होते. धुक्यामुळे सकाळच्या वेळी पन्नास फुटांच्या पुढे दिसणेही अशक्य झाले होते. त्यामुळे रहदारीवर परिणाम दिसून आला. थंडीच्या लाटेचा सामना करणाऱ्या औरंगाबाद शहरात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. अधूनमधून वेगवेगळ्या भागांत हा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुके निर्माण झाले आहे. शुक्रवारी पहाटे शहर आणि परिसरात सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. सकाळच्या वेळी अगदी जवळचेही दिसत नव्हते. त्यामुळे वाहतूक रोडावली होती. वाहनधारकांना हेडलाईट लावून वाहन चालवावे लागत होते. सकाळी ११ वाजेपर्यंत हे धुके काही प्रमाणात कायम होते. दुसरीकडे गारठा निर्माण झाल्यामुळे शहराच्या कमाल तापमानातही आज काही घट दिसून आली. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसभर सूर्यदर्शन होऊ शकले नाही. त्यामुळे कमाल तापमानही आज २४.५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. दरम्यान, जिल्ह्यात बुधवारपासून अवकाळी पाऊस दाखल झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांत जिल्ह्यात सरासरी ९.११ मि. मी. पाऊस झाला. शुक्रवारी रात्रीही शहरात सुमारे तासभर पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे थंडीत मात्र चढउतार होत आहे.