शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

शहराला ओडीएफमध्ये डबल प्लस मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये हागणदारीमुक्त शहरासाठी औरंगाबादला ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ ...

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये हागणदारीमुक्त शहरासाठी औरंगाबादला ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही शहराला त्याचा फायदा होऊ शकतो.

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा समावेश पहिल्या दहा क्रमांकांमध्ये असावा, या दृष्टीने महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नियोजन करीत विविध उपक्रम राबवून प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. केंद्र सरकारतर्फे नियुक्त त्रयस्थ संस्थेने १२ ते १५ जानेवारी या काळात शहरातील ५३ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. मध्यरात्री आणि पहाटे तपासणी करण्यात आली. या पाहणीचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला असून, त्यात औरंगाबाद महापालिकेला ‘ओडीएफ डबल प्लस’ मानांकन जाहीर झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील ‘स्टार रेटिंग’ आणि सर्वेक्षणाच्या अंतिम निकालासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेने पडेगाव येथे १० एमएलडी, झाल्टा येथे ३५ एमएलडी, डॉ. सलीम अली सरोवर येथे ५ एमएलडी, कांचनवाडी येथील १६१ एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्लँट (मलजल प्रक्रिया प्रकल्प) उभारले आहेत. 'एसटीपी'मधून रोज सुमारे ६० ते ७० 'एमएलडी' पाण्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी नाल्यात सोडून दिले जाते. शिवाय निर्माण होणारे खत नागरिकांना मोफत दिले जाते. भूमिगत गटार योजना, ‘एसटीपी’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचा फायदा या मानांकनासाठी झाल्याचे भोंबे यांनी सांगितले.

'ओडीएफ डबल प्लस' म्हणजे काय?

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत देशातील शहरे हागणदारीमुक्त व्हावीत, यावर सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे. त्या अंतर्गतच शहरातील कोणत्याही भागात उघड्यावर लघवी किंवा शौच करताना कोणी आढळून येत नाही ना, याची तपासणी केली जाते. त्याशिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालये व्यवस्थित कार्यान्वित असावीत, असाही निकष आहे.

-----

स्वच्छतागृह, एसटीपी प्लँटचे कौतुक

पडेगाव, झाल्टा, डॉ. सलीम अली सरोवर, कांचनवाडी येथील एसटीपी प्लँटच्या (मलजल प्रक्रिया प्रकल्प) कामाबद्दलही कौतुक करीत त्यास ‘ओडीएफ डबल प्लस’ मानांकन देण्यात आले आहे. शहरातील ११ स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यांपैकी पाच स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबद्दल महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कौतुक करीत अन्य स्वच्छतागृहांना ‘स्वच्छता’ हा शेरा दिला आहे.