शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

शहराला ओडीएफमध्ये डबल प्लस मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:06 IST

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये हागणदारीमुक्त शहरासाठी औरंगाबादला ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ ...

औरंगाबाद : केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’मध्ये हागणदारीमुक्त शहरासाठी औरंगाबादला ओडीएफ डबल प्लस मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणाच्या अंतिम निकालातही शहराला त्याचा फायदा होऊ शकतो.

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा समावेश पहिल्या दहा क्रमांकांमध्ये असावा, या दृष्टीने महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी नियोजन करीत विविध उपक्रम राबवून प्रत्यक्षात अंमलबजावणीस सुरुवात केली आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. केंद्र सरकारतर्फे नियुक्त त्रयस्थ संस्थेने १२ ते १५ जानेवारी या काळात शहरातील ५३ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. मध्यरात्री आणि पहाटे तपासणी करण्यात आली. या पाहणीचा निष्कर्ष नुकताच जाहीर केला असून, त्यात औरंगाबाद महापालिकेला ‘ओडीएफ डबल प्लस’ मानांकन जाहीर झाले आहे. स्वच्छ सर्वेक्षणातील ‘स्टार रेटिंग’ आणि सर्वेक्षणाच्या अंतिम निकालासाठी त्याचा उपयोग होणार असल्याचे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे यांनी सांगितले. औरंगाबाद महापालिकेने पडेगाव येथे १० एमएलडी, झाल्टा येथे ३५ एमएलडी, डॉ. सलीम अली सरोवर येथे ५ एमएलडी, कांचनवाडी येथील १६१ एमएलडी क्षमतेचे एसटीपी प्लँट (मलजल प्रक्रिया प्रकल्प) उभारले आहेत. 'एसटीपी'मधून रोज सुमारे ६० ते ७० 'एमएलडी' पाण्यावर प्रक्रिया करून प्रक्रिया केलेले पाणी नाल्यात सोडून दिले जाते. शिवाय निर्माण होणारे खत नागरिकांना मोफत दिले जाते. भूमिगत गटार योजना, ‘एसटीपी’च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामाचा फायदा या मानांकनासाठी झाल्याचे भोंबे यांनी सांगितले.

'ओडीएफ डबल प्लस' म्हणजे काय?

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मोहिमेत देशातील शहरे हागणदारीमुक्त व्हावीत, यावर सुरुवातीपासून भर देण्यात आला आहे. त्या अंतर्गतच शहरातील कोणत्याही भागात उघड्यावर लघवी किंवा शौच करताना कोणी आढळून येत नाही ना, याची तपासणी केली जाते. त्याशिवाय, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि शौचालये व्यवस्थित कार्यान्वित असावीत, असाही निकष आहे.

-----

स्वच्छतागृह, एसटीपी प्लँटचे कौतुक

पडेगाव, झाल्टा, डॉ. सलीम अली सरोवर, कांचनवाडी येथील एसटीपी प्लँटच्या (मलजल प्रक्रिया प्रकल्प) कामाबद्दलही कौतुक करीत त्यास ‘ओडीएफ डबल प्लस’ मानांकन देण्यात आले आहे. शहरातील ११ स्वच्छतागृहांची पाहणी करून त्यांपैकी पाच स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबद्दल महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून कौतुक करीत अन्य स्वच्छतागृहांना ‘स्वच्छता’ हा शेरा दिला आहे.