शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील रस्ते ‘चक्का जाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. क्रांतीचौकात दुपारी १ वाजेच्या ...

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जालना रोडवरील वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडल्याचे मंगळवारी पाहायला मिळाले. क्रांतीचौकात दुपारी १ वाजेच्या सुमारास आकाशवाणीकडून गोपाल टीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सुमारे २० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. यासोबतच जुन्या शहरातील प्रमुख रस्त्यांवर सोमवारी आणि आज मंगळवारीही नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. सहायक पोलीस आयुक्तांसह, पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि वाहतूक कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा या विभागाकडे आहे, असे असताना गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडून गेल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही चौकातील डाव्या लेनवर एकही वाहन उभे राहणार नाही, याची खबरदारी तेथे तैनात वाहतूक पोलिसांनी घेणे गरजेचे असते. क्रांतीचौकातील आकाशवाणीकडून गोपाल टी पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील डावी लेन मंगळवारी दुपारी वाहनचालकांनी व्यापली होती. वाहनचालक यामुळे गोपाल टी पॉइंट, रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले. यावेळी वाहनचालक वाहतूक सिग्नल तोडून वाहने पळविताना दिसले. विशेष म्हणजे एक वाहतूक कर्मचारी तेथे तैनात होता. या कर्मचाऱ्यांच्या हाताबाहेर ही वाहतूक गेल्याचे दिसून आले. तेथे तैनात वाहतूक कर्मचारी वेगवेगळ्या कॉर्नरवर जाऊन थांबत आणि वाहतूक नियमन करीत. यामुळे हा चौक ओलांडण्यासाठी वाहनचालकांना सुमारे १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागले.

सेव्हन हिल ते सूतगिरणी रोडवरही दुपारच्या वेळी वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. जालना रोडवर आकाशवाणी चौकातही वाहनांची मोठी गर्दी दिसली.

-चौकट...

जुन्या शहरात वाहतूक कोंडी

शहराच्या प्रमुख बाजारपेठ असलेल्या गुलमंडी, शहागंज, सिटीचौक, औरंगपुरा, चौराह, राजाबाजार आदी ठिकाणच्या प्रत्येक रस्त्यावर सोमवारी आणि मंगळवारी सलग दोन दिवस वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागला. अरुंद रस्त्यावर दुकानदार आणि त्यांचे ग्राहक वाहने उभी करतात. यातून ही कोंडी हाेत असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलिसांचे जुन्या शहरातील रस्त्यावरील वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका सामान्य वाहनचालकांना बसत आहे.