शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

शहरात ७०० टँकर करतात पाण्याचा धंदा

By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. नदी-नाले कोरडी पडली असून, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरशहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. नदी-नाले कोरडी पडली असून, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. परिणामी कांही विंधनविहिरींचे पाणीच गायब झाले आहे. अशा भयावह दुष्काळात मात्र टॅँकर लॉबी मालामाल होत आहे़ शहरात तब्बल ७०० छोट्या-मोठ्या पाण्याचे टँकर पाण्याचा व्यवसाय करीत आहेत़ हा आकडा जिल्ह्यात ३ हजार ५०० च्या वर गेला आहे़ पाणीटंचाई इतकी भिषण होत चालली आहे की, सध्यस्थितीत ५ हजार लिटर्स पाण्याचे टँकर ५०० रुपयाला विकले जात आहे़ त्यातील पाणी पिण्यायोग्य असेल याची खात्री नाही़शहरात महिन्यातून दोन वेळा महापालिकेकडून पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरु आहेत. मांजरा धरणात मृत जलसाठा आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या झळांची चाहूल सुरु झाली आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटात मात्र जिल्हाभरातील टॅँकरलॉबी आता सक्रीय झाली आहे. या व्यवसायात येणाऱ्या वाहनधारकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक वाहनधारकांना काम राहिले नाही. वाहनतळावर दिवसदिवस थांबून राहिले तरी भाडे मिळत नाही. यातून कांही टमटम, अ‍ॅपेधारकांनी आपल्या गाड्यातून पाणीविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. ज्याच्याकडे पाणी आहे, त्यांना पाण्याचे ठराविक पैसे द्यायचे आणि आपले टॅँकर, बॅरल भरुन घ्यायचे...मग मागेल त्यांना याचा पुरवठा करायचा, असा हा नगदी पैसे देणारा व्यवसाय असल्याने अनेक वाहनधारकांनी यात दुष्काळातही उड्या घेतल्या आहेत. मोठे टॅँकर हे किमान ६ हजार ते १२ हजार लिटरचे असल्यामुळे या टॅँकरला घरगुत्ती ग्राहक मिळत नाही. मोठ्या टॅँकरला हॉटेल, हॉस्टेल, कार्यालय, मंगलकार्यालय, विविध कार्यक्रम आदींकडून मागणी असते. तर १ ते ५ हजार लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरला मात्र कौटुंबिक ग्राहक मिळतो. छोट्या टॅँकरवाल्याकडून २५० ते ३०० रुपये आकारले जाते. विशेष म्हणजे अंतर पाहून हे भाडे ठरविल जाते. सध्या जिल्हाभरात बेसुमार पाणीउपसा या व्यवसायाच्या नावाखाली रात्रंदिन सुरु आहे.