शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ७०० टँकर करतात पाण्याचा धंदा

By admin | Updated: December 28, 2015 00:20 IST

राजकुमार जोंधळे , लातूर शहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. नदी-नाले कोरडी पडली असून, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे.

राजकुमार जोंधळे , लातूरशहरासह जिल्ह्यातील पाणीप्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. नदी-नाले कोरडी पडली असून, विंधनविहिरींची पाणीपातळीही खालावली आहे. परिणामी कांही विंधनविहिरींचे पाणीच गायब झाले आहे. अशा भयावह दुष्काळात मात्र टॅँकर लॉबी मालामाल होत आहे़ शहरात तब्बल ७०० छोट्या-मोठ्या पाण्याचे टँकर पाण्याचा व्यवसाय करीत आहेत़ हा आकडा जिल्ह्यात ३ हजार ५०० च्या वर गेला आहे़ पाणीटंचाई इतकी भिषण होत चालली आहे की, सध्यस्थितीत ५ हजार लिटर्स पाण्याचे टँकर ५०० रुपयाला विकले जात आहे़ त्यातील पाणी पिण्यायोग्य असेल याची खात्री नाही़शहरात महिन्यातून दोन वेळा महापालिकेकडून पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरु आहेत. मांजरा धरणात मृत जलसाठा आहे. भविष्यातील पाणीटंचाईच्या झळांची चाहूल सुरु झाली आहे. दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या संकटात मात्र जिल्हाभरातील टॅँकरलॉबी आता सक्रीय झाली आहे. या व्यवसायात येणाऱ्या वाहनधारकांची संख्या दिवसागणिक वाढू लागली आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक वाहनधारकांना काम राहिले नाही. वाहनतळावर दिवसदिवस थांबून राहिले तरी भाडे मिळत नाही. यातून कांही टमटम, अ‍ॅपेधारकांनी आपल्या गाड्यातून पाणीविक्रीचा व्यवसाय थाटला आहे. ज्याच्याकडे पाणी आहे, त्यांना पाण्याचे ठराविक पैसे द्यायचे आणि आपले टॅँकर, बॅरल भरुन घ्यायचे...मग मागेल त्यांना याचा पुरवठा करायचा, असा हा नगदी पैसे देणारा व्यवसाय असल्याने अनेक वाहनधारकांनी यात दुष्काळातही उड्या घेतल्या आहेत. मोठे टॅँकर हे किमान ६ हजार ते १२ हजार लिटरचे असल्यामुळे या टॅँकरला घरगुत्ती ग्राहक मिळत नाही. मोठ्या टॅँकरला हॉटेल, हॉस्टेल, कार्यालय, मंगलकार्यालय, विविध कार्यक्रम आदींकडून मागणी असते. तर १ ते ५ हजार लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकरला मात्र कौटुंबिक ग्राहक मिळतो. छोट्या टॅँकरवाल्याकडून २५० ते ३०० रुपये आकारले जाते. विशेष म्हणजे अंतर पाहून हे भाडे ठरविल जाते. सध्या जिल्हाभरात बेसुमार पाणीउपसा या व्यवसायाच्या नावाखाली रात्रंदिन सुरु आहे.