शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

नागरिकांना बसणार पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:05 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतींंकडे सार्वजनिक पाणीपुरवठ्यापोटी कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी ...

औरंगाबाद : मराठवाड्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतींंकडे सार्वजनिक पाणीपुरवठ्यापोटी कोट्यवधी रुपयांचे वीजबिल थकले आहे. या थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. परिणामी, नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या १२ हजार ७५४ वीज जोडण्यांचे तब्बल ५५०.५८ कोटी रुपये थकबाकी आहे. वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणचा आर्थिक गाडा चालविणे अशक्य आहे. या पाणीपुरवठा ग्राहकांचा थकबाकीसाठी कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यासाठी वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

वीजबिलाच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणला वीज खरेदी, वीज वहन, वीज यंत्रसामुग्री खरेदी, उपकेंद्र निर्मिती, देखभाल व दुरुस्ती, व्यवस्थापन खर्च, बँकांचे कर्ज व व्याजाची परतफेड दरमहा आदी खर्चाला सामोरे जावे लागते. यासाठी वीजबिलाच्या थकबाकीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याशिवाय पर्याय नाही, असे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश

थकीत वीजबिलासाठी वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणच्या व्यवस्थापनाने क्षेत्रीय कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते यांना दिले आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पदाधिकारी यांनी वीजबिल भरण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.