शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी सातारा-देवळाईतील नागरिक जलआंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:12 IST

सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे. यंदा पावसाळ्यात बोअरवेलची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे संकट गडद झाल्याने जनआंदोलनासाठी नागरिक एकवटले आहेत.महानगरपालिकेत येण्यासाठी नागरिकांना पाणी, रस्ते, लाइट, ड्रेनेज या चार सुविधांचे गाजर दाखविण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या काळात स्थानिक जलस्रोत आटले की, सरकारी यंत्रणा टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवत होती; परंतु आता पाणी...पाणी म्हणत नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात पाण्यासाठी नागरिकांचा सततचा संघर्ष सुरू होता, तर आज महानगरपालिकेत आल्यावर तो पुन्हा बळावला आहे. मनपाने टँकर पुरवठ्याच्या पाण्यावर लावलेला खर्च अन् टँकरच्या फेºयातही तफावत जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.सातारा-देवळाईत इतर जलस्रोतावरून पाणी लिफ्टिंग करून आणणे जेवढे जिकरीचे आहे, त्यापेक्षाही मनपाच्या जलवाहिनीला सातारा-देवळाई जोडणे सोयीचे ठरणार आहे. जलकुंभ उभारून जनतेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. टँकरच्या पाण्यावर जनतेची तहान भागत नाही. ३० दिवसांचे पैसे भरून घेतात अन् त्या तुलनेत किती ड्रम आणि किती दिवस पाणीपुरवठा करता, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.गावाची भौगोलिक अवस्था पाहता येथील नागरिकांना शासकीय मदत मिळण्यास खूप विलंब लागतो, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या परदरी तलावातील पाणीसाठा या वर्षात थोडाफार वाढला आहे. त्या पाण्यातून स्थानिक नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो; परंतु उगाचच आमच्या तोंडचे पाणी पळवून तुमचाही घसा कोरडा आणि गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी पाहणीसाठी गेलेल्या मनपाच्या पथकालादेखील विरोध केला आणि पुढेही तो कायम असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.गावातून सातारा-देवळाईपर्यंत पाणी मनपाने जायकवाडीच्या जलवाहिनीतूनच द्यावे, अशी भूमिका सातारा-देवळाईच्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर नागरिकांचे जलआंदोलन उभे राहत आहे.