शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

पाण्यासाठी सातारा-देवळाईतील नागरिक जलआंदोलनाच्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:12 IST

सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सातारा-देवळाईतील जुन्या जलस्रोतावर लाखोंची तहान भागत नाही, नाइलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर परिसर तगतो आहे. यंदा पावसाळ्यात बोअरवेलची पातळी खालावली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याचे संकट गडद झाल्याने जनआंदोलनासाठी नागरिक एकवटले आहेत.महानगरपालिकेत येण्यासाठी नागरिकांना पाणी, रस्ते, लाइट, ड्रेनेज या चार सुविधांचे गाजर दाखविण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या काळात स्थानिक जलस्रोत आटले की, सरकारी यंत्रणा टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांची तहान भागवत होती; परंतु आता पाणी...पाणी म्हणत नागरिकांचा घसा कोरडा पडला आहे. पूर्वी ग्रामपंचायतीच्या काळात पाण्यासाठी नागरिकांचा सततचा संघर्ष सुरू होता, तर आज महानगरपालिकेत आल्यावर तो पुन्हा बळावला आहे. मनपाने टँकर पुरवठ्याच्या पाण्यावर लावलेला खर्च अन् टँकरच्या फेºयातही तफावत जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना जारचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.सातारा-देवळाईत इतर जलस्रोतावरून पाणी लिफ्टिंग करून आणणे जेवढे जिकरीचे आहे, त्यापेक्षाही मनपाच्या जलवाहिनीला सातारा-देवळाई जोडणे सोयीचे ठरणार आहे. जलकुंभ उभारून जनतेला जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. टँकरच्या पाण्यावर जनतेची तहान भागत नाही. ३० दिवसांचे पैसे भरून घेतात अन् त्या तुलनेत किती ड्रम आणि किती दिवस पाणीपुरवठा करता, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.गावाची भौगोलिक अवस्था पाहता येथील नागरिकांना शासकीय मदत मिळण्यास खूप विलंब लागतो, डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या परदरी तलावातील पाणीसाठा या वर्षात थोडाफार वाढला आहे. त्या पाण्यातून स्थानिक नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघू शकतो; परंतु उगाचच आमच्या तोंडचे पाणी पळवून तुमचाही घसा कोरडा आणि गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने पाणी पाहणीसाठी गेलेल्या मनपाच्या पथकालादेखील विरोध केला आणि पुढेही तो कायम असल्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.गावातून सातारा-देवळाईपर्यंत पाणी मनपाने जायकवाडीच्या जलवाहिनीतूनच द्यावे, अशी भूमिका सातारा-देवळाईच्या नागरिकांनी घेतली आहे. त्यामुळे पाणी प्रश्नावर नागरिकांचे जलआंदोलन उभे राहत आहे.