शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

चोरघडे यांची कथा मानवतावादाचा केंद्रबिंदू

By admin | Updated: August 2, 2014 01:40 IST

उस्मानाबाद : ग्रामीण भागातून ज्ञान निर्मितीची प्रक्रिया जोवर होत नाही.

उस्मानाबाद : ग्रामीण भागातून ज्ञान निर्मितीची प्रक्रिया जोवर होत नाही. तोवर सशक्त भारत निर्माण होणार नाही. हे गांधी तत्वज्ञान आपल्या साहित्यातून अविष्कृत करणाऱ्या वामन कृष्णा चोरघडे यांची कथा खऱ्या अर्थाने मानवतावादाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन प्रख्यात साहित्यिक तथा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. राजन गवस यांनी केले.मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गांधीवादी विचारसरणीचे लेखक वामन कृष्णा चोरघडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शहरातील हॉटेल मेघमल्हार सभागृहात गुरुवारी वामन चोरघडे यांची कथा या विषयावर गवस यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतीकराव ठाले-पाटील, कार्यवाहक कुंडलिक आतकरे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य किरण सगर, उस्मानाबाद शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गवस म्हणाले की, पूर्वी लिखित परंपरा नव्हती. अक्षर वाङमय नव्हते. त्याकाळी तोंडी रचना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केली जायची.हे ज्ञानसंक्रमण म्हणजे खरे साहित्य.साहित्याचे हे मूलधन चोरघडे यांनी खेडोपाडी भ्रमंती करून एकत्रित केले. आधुनिक नवकथेला चोरघडे यांच्या या कामाचा मोठा लाभ झाला असल्याचेही डॉ. गवस यांनी नमूद केले. कथेला गांधी तत्वज्ञान बहाल करण्याचे मोठे काम चोरघडे यांनी केले. स्त्रीचा गुदमरलेला श्वास मोकळा करणाऱ्या अनेक कथा त्यांनी प्रभावीपणे वाचकांच्या हवाली केल्या आहेत. गांधी विचारावर निष्ठा असल्यामुळेच माणसाविषयी अतीव श्रद्धेने चोरघडे यांनी लिखाण केले असल्याचे गवस यांनी सांगितले.उस्मानाबादकरांनी साहित्य आणि साहित्यिकाना नेहमीच सन्मान दिला असल्याचे सांगून ठाले-पाटील यांनी उस्मानाबादला अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे. यासाठी प्रभावी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. साहित्य संमेलन आयोजित करण्यासाठी उस्मानाबादकरांमध्ये निर्माण झालेली उर्मी उभ्या राज्याला ठाऊक झाली असल्याचे सांगून संमेलन उस्मानाबादला होणारच असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. कुंडलिक अतकरे यांनी उस्मानाबादमध्ये होत असलेल्या साहित्यिक उपक्रमाचे कौतुक केले. प्रास्ताविक नितीन तावडे यांनी केले. सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी केले. आभार राजेंद्र अत्रे यांनी मानले. प्रारंभी वामन चोरघडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास शहर व परिसरातील साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)