शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

शिशू कल्याण योजनेला घरघर

By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST

गंगाधर तोगरे, कंधार सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रम शासनाने राबविला.

गंगाधर तोगरे, कंधारसुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यक्रम शासनाने राबविला. रुग्णांना वाहन सेवा व भोजन मोफत पुरविले जाते. परंतु योजनेला निधीअभावी घरघर लागली आहे. वाहनासाठीचा डिझेल खर्च तात्पुरता रुग्ण, नातेवाईकांना पदरमोड करावा लागत आहे. तर भोजन उधारीवर भागवावे लागत असल्याची बाब समोर आली आहे. ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मात्र पळता भूई होतानाचे चित्र आहे.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत नागरिकांना विविध आरोग्य सेवा दिल्या जातात. नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी विविध प्र्रकारच्या सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांचे आरोग्य योजनेतून भक्कम होत असल्याचे प्रकर्षाने पुढे आले आहे. केंद्र व राज्य शासनाने आरोग्य सुविधेत मोठी वाढ केली आहे. जोखिमेची प्रसूती सुरक्षित करण्यासाठी जननी शिशू सुरक्षा कल्याण योजना कार्यान्वित करण्यात आली. ग्रामीण रुग्णालय व पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाहन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. प्रसूतीसाठी महिलांना घेऊन जाणे व पुन्हा घरी आणून सोडणे मोफत सेवा दिली जाते. परंतु आता एक ते सव्वा महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयात निधी उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातही अन्य बाबीतून डिझेल खर्च करण्याचा प्रसंग आला आहे.शहरातील ग्रामीण रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात दररोज पाचशे ते सहाशे रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. तज्ञांचा अभाव व स्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाणवा हा सतत चिंतेचा विषय झाला आहे. अस्थायी, आयुष, मानद डॉक्टरावर रुग्णसेवेचा भार आहे. त्यातच जे. एस. एस. एस. के. ची भर पडली आहे. नातेवाईक, रुग्णांनी १०२ क्रमांकाला कॉल केल्यास तत्काळ वाहन पाठवले जाते. प्रसूतीसाठीची संदर्भ वाहन सेवा पुरविणे अनिवार्य आहे. मोफत वाहन सेवा असून सुखरुप प्रसूती होणे या सेवेत अभिप्रेत आहे.रुग्णास ग्रामीण रुग्णालय नांदेडचे शासकीय रुग्णालय या ठिकाणी दाखल केले जाते. प्रवासासाठी ये-जा करणे वाहनसेवा मोफत आहे. परंतु एक ते सव्वा महिन्यांपासून निधी उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्ण, नातेवाईकांना डिझेल पुरविण्याचा, खर्च करण्याचा प्रसंग समोर आला आहे. जवळपास ४० जणांनी पदरमोड केल्याचे समजते. निधी आल्यानंतर रुग्णांचे पैसे परत केले जाणार असल्याचे ग्रामीण रुग्णालय सूत्रांनी सांगितले. त्यातच भोजन हे शहरातील एका उपाहारगृहातून उधारीवर घेतले जात आहे. रुग्ण-नातेवाईकांच्या शंकाचे निरसन करण्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांची पळता भूई थोडी होत असल्याचे चित्र आहे. १०२ क्रमांकाप्रमाणेच बारुळ व कुरुळासाठी १०८ क्रमांक संदर्भसेवेचे वाहन उपलब्ध आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहनातून रुग्णास कंधार, नांदेड व मुखेड येथे सोयीच्या ठिकाणी घेऊन जातात. ग्रामीण रुग्णालयाकडे रुग्ण घेऊन जाण्याचा, दाखल करण्याचा कल अधिक आहे. अतिशय जोखीमेचा रुग्ण नांदेडला पाठविण्याचे प्रमाण शहरातून अधिक असल्याने ग्रामीण रुग्णालयाची मोठी दमछाक होत असल्याचे चित्र आहे. निधी तत्काळ उपलब्ध करुन देवून रुग्णांना दिलासा देण्याची मागणी होत आहे़