शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी खालावले ‘बालस्वास्थ्य’

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

संजय तिपाले , बीड भावी पिढींच्या आरोग्याची देखभाल घेण्यासाठी सुरु केलेल्या बालस्वास्थ्य कार्यक्रमाचेच ‘स्वास्थ्य’ नियोजनाअभावी खालावले आहे.

संजय तिपाले , बीडभावी पिढींच्या आरोग्याची देखभाल घेण्यासाठी सुरु केलेल्या बालस्वास्थ्य कार्यक्रमाचेच ‘स्वास्थ्य’ नियोजनाअभावी खालावले आहे. तपासणीसाठी नियुक्त पथक व अंगणवाड्या यांच्यात ताळमेळ नसल्याने ही स्थिती ओढावली आहे. महत्त्वाचे म्हणजे अंगणवाडीतार्इंना बालकांच्या आरोग्याचे मूल्यमापन करण्याचे ‘बेसिक’ प्रशिक्षणच दिले गेले नसल्याची खळबळजनक बाबही पुढे आली आहे. जिल्ह्यातील २१०३ बालके कुपोषित असून बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या तपासणीतून लाखाहून अधिक बालके सुटल्याने कुपोषित बालकांची संख्या यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अंगणवाडीताई प्रत्येक महिन्याला बालकांच्या आरोग्याचे मूल्यमापन करतात तर बालस्वास्थ्य तपासणीसाठी नेमलेली ३९ पथके तीन महिन्याला तपासणी करतात. पथकांत बीएएमएस डॉक्टरांचा समावेश आहे; पण अंगणवाडीतार्इंना कुठलेही प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या बालआरोग्याच्या नोंदींवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. पूर्वी बालकांच्या वयानुसार त्याचे वजन मोजले जायचे. आता वयानुसार उंची, अंगावरील सूज व दंडघेराचे मोजमाप होते. त्यामुळे आरोग्याच्या मूल्यमापनाची प्रक्रियाच अंगणवाडीतार्इंसाठी किचकट बनली आहे. दरम्यान, जिल्ह्यात एप्रिल ते जून २०१४ या दरम्यान सुमारे १ लाख ६८ हजार २०१ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३५ हजार ३७५ बालकांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. २६३ बालके शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरली आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ५१ बालकांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. उर्वरित २१२ बालकांच्या शस्त्रक्रिया रखडलेल्या आहेत. काही बालकांच्या शस्त्रक्रिया जिल्ह्याबाहेरील दवाखान्यांत कराव्या लागणार आहेत. त्यांना ‘रेफर’ करुन शस्त्रक्रिया करण्याचे कामही रखडले आहे.उपाययोजना सुरुबालस्वास्थ्य कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यावर आमचा भर आहे. २१ ठिकाणी ग्रामबालविकास केंद्रे सुरु केली आहेत. तेथे बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते. शस्त्रक्रिया रखडल्या असल्या तरी तज्ज्ञांना पाचारण करण्यात येईल किंवा बालकांना रेफर करुन योग्य ते उपचार करण्यात येतील. बालकांचे आरोग्य ठणठणीत रहावे, यासाठी पुरेपूर प्रयत्न असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. नसरुद्दीन पटेल यांनी ‘लोकमत’ला सांगितले.बालविकास केंद्रांतही हेळसांड !कुपोषित बालकांसाठी जिल्ह्यात २१ ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ग्रामबालविकास केंद्रे सुरु आहेत. तेथे बालकांना आठवेळा विशेष आहार देऊन त्यांच्या आरोग्याची देखभाल घेऊन बालके सदृढ बनविले जाते. त्यासाठी २१ दिवसांत एका बालकावर ५ हजार २५० रुपये खर्च केले जातात; पण जिल्ह्यातील ग्रामबालविकास केंद्रांमध्ये आठवेळा आहार दिलाच जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. या कें द्रांत ७५ बालकांची नोंद आहे; पण अनेक पालक आपल्या बालकांना केंद्रात आणत नाहीत की, अंगणवाडीताई किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत असे चित्र आहे.