शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
3
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
4
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
5
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
8
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
9
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
10
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
11
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
12
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
13
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
14
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
15
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
16
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
17
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
20
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा

भांगतीमाता गडाजवळ रसायनयुक्त सांडपाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:20 IST

करोडीनंतर ऐतिहासिक भांगसी माता गडालगत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे.

वाळूज महानगर : करोडीनंतर ऐतिहासिक भांगसी माता गडालगत रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचे मंगळवारी उघडकीस आले आहे. दरम्यान, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन करोडी शिवारातील घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या परिसरात मोकळ्या भूखंडावर सर्रासपणे रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असून, याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळेझाक करीत असल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण आहे.

वाळूज उद्योनगरीतील काही कंपन्यांनी सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राजकीय वरदहस्त लाभलेल्या ठेकेदारामंडळींवर सोपविली आहेत. कारखान्यांतील रसायनयुक्त सांडपाणी टँकरद्वारे छुप्या पद्धतीने शेतजमिनी, मोकळे भूखंड, तलाव तसेच नदी-नाल्यात सर्रासपणे सोडले जात आहे. विशेष म्हणजे याबाबतच्या तक्रारी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केलेल्या आहेत. मात्र, प्रदुषण मंडळाचे अधिकारी सांडपाण्याचे नमुने घेतात. मात्र, या नमुन्याचा प्रयोगशाळेचा अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. भांगतीमाता गडाजवळील गट क्रमांक २४ मध्ये घातक रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याची माहिती मंगळवारी नागरिकांना मिळाली. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्यामुळे एस.एस.पवार, सरपंच नंदाबाई कान्हेरे, परसराम कान्हेरे, भाऊसाहेब आधाने, सुनिल कान्हेरे आदींनी घटनास्थळाची पाहणी केली.करोडी शिवारात सोमवारी आणि शरणापूर शिवारातील भांगसीमाता गडाजवळ मंगळवारी घातक रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याची तक्रार ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिकांनी महसूल विभागाकडे केली होती. मंडळ अधिकारी के. एल. गाडेकर, तलाठी डी. डी.सोनवणे, ग्रामसेवक कटारे, एकनाथ सांगळे आदींनी करोडी भागाची पाहणी केली. यात जवळपास १६ टँकर रसायनयुक्त सांडपाणी सोडल्याचे दिसून आल्याने पथकाने पंचनामा केला. या विषयी प्रदुषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कदम व क्षेत्रीय अधिकारी डॉ.गजाजन खडकीकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

रसायनयुक्त सांडपाण्याची पाझर तलाव, जमिनी, मोकळे भुखंड आदी ठिकाणी विल्हेवाट लावली जात आहे. ते जमिनीत पाझरुन परिसरातील विहिरी, बोअर, हातपंप आदीचे पाणी दूषित झाले आहे. परदेशवाडी व रांजणगाव पाझर तलावही प्रदूषित झाले आहे. खाजगी जमिनीही यामुळे नापीक होण्याची भिती शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे या सांडपाण्यामुळे जनावरांच्या जिवितासही धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :Walujवाळूज