शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

स्वस्त धान्य दुकानांचा संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:57 IST

तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करावे, तेथील दुकानदारांप्रमाणे दरमहा ३५हजारांचे मानधन द्यावे, ई-पॉस मशीनमधील डाटा दुरुस्ती करून द्यावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत. हिंगोलीतही १ आॅगस्टपासून हा संप सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर अन्न महामंडळ स्थापन करावे, तेथील दुकानदारांप्रमाणे दरमहा ३५हजारांचे मानधन द्यावे, ई-पॉस मशीनमधील डाटा दुरुस्ती करून द्यावी, आदी मागण्यांसाठी राज्यभरात स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत. हिंगोलीतही १ आॅगस्टपासून हा संप सुरू आहे.स्वस्त धान्य दुकानदारांनी सर्व तहसील कार्यालयांना याबाबत निवेदने दिली होती. त्यात तामिळनाडू राज्यात स्थापन करण्यात आलेल्या अन्न महामंडळाप्रमाणे महाराष्ट्रातही महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांना सामावून घेऊन त्यांना दरमहा ३५ हजार रुपये मानधन द्यावे, अशीही मागणी आहे. तर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ई-पॉस मशिनचा वापर सक्तीचा करण्यात येत असला तरीही त्यावरील डाटा बेस चार ते पाच वेळा दुरुस्त करूनही प्रत्यक्षात मशिनवर चुकीचाच येत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे एपीएलचे लाभार्थी बीपीएलमध्ये तर बीपीएलचे एपीएलमध्ये येत आहेत. यात कहर म्हणजे अन्नसुरक्षाच याद्यांतील लाभार्थ्यांच्या नावासमोर तर धान्यच दिसत नाही. काही ठिकाणी एकाच गावात दोन ते तीन दुकाने आहेत. त्यामुळे दुकानदारांकडील युनिट रजिस्टरमधील लाभार्थीसंख्येतील अनेक लाभार्थी दुसºया दुकानास जोडले गेले आहेत. त्यामुळे धान्य एका दुकानास अन् लाभार्थी भलतीकडेच असा प्रकार घडत आहे.याबाबत प्रशासनाकडे गाºहाणे मांडले की, दुरुस्ती करून घेण्यास सांगितले जाते. आॅपरेटरकडे बसून दुकानदार दुरुस्ती करुन घेतात. प्रत्यक्षात मात्र चुकीच्याच याद्या ई-पॉस मशिनवर दिसतात. त्यामुळे दुकानदारांनाही काही मेळ लागत नाही.शासनाने यापूर्वीही स्वस्त धान्य दुकानदारांना नुसतीच आश्वासने दिली. त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत संघटना स्वस्थ बसणार नाही. जिल्ह्यातील सर्व दुकानदार या संपात सहभागी असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भिकूलाल बाहेती, अशोक काळे, नवनाथ कानबाळे, फारुख खाँ मुनेरखाँ पठाण, नागेश बांगर, अमित बांगर, भाऊराव मुटकुळे, संजय खंडेलवाल आदींनी सांगितले.