शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
5
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
6
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
7
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
8
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
9
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
10
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
11
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
12
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
13
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
14
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
15
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
16
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
17
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
18
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
19
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
20
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपडे पालटणाऱ़़़!

By admin | Updated: July 31, 2014 00:42 IST

संजय तिपाले, बीड कधी आरोग्य केंद्र बंद... कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर कधी औषध व उपचार साहित्यांचा अभाव... हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निराशाजनक चित्र आता बदलणार आहे.

संजय तिपाले, बीडकधी आरोग्य केंद्र बंद... कधी वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती तर कधी औषध व उपचार साहित्यांचा अभाव... हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतील निराशाजनक चित्र आता बदलणार आहे. कारण आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ‘कायापालट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी एक कोटींचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सोहनिक यांच्या संकल्पनेतून कायापालट योजना पुढे आली आहे. पुणे जिल्ह्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही योजना राबविली जाईल. यातून ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी पायाभूत सोयी व अद्ययावत साधने उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. सुशोभिकरण, लेक वाचवा मोहीम, कुपोषण निर्मूलन, माता- बाल आरोग्य असे विविध उपक्रम राबविण्यात येतील. शिवाय वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे. जिल्हा प्रजनन व बालस्वास्थ्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी कायापालटसाठी मूलभूत सुविधांचा अभाव असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. तो मंजुरीसाठी लवकरच सीईओ राजीव जवळेकर यांच्यापुढे ठेवला जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन डोईफोडे यांनी दिली.या सुविधांचा समावेश...कायापालटअंतर्गत प्राथमिक आरोग्य कें द्रांतील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. शस्त्रक्रियागृहात टाईल्स लावण्यात येतील, सूचनाफलक, औषधी तक्रार पेटी, विविध योजनांची माहिती दर्शवणारे फलक बसविले जातील. सर्व अधिकारी कर्मचारी ओळखपत्र वापरतील. वैद्यकीय अधिकाऱ्यांना अ‍ॅप्रनचा सक्तीने वापरावे लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्राचे सुशोभिकरण केले जाणार आहे. रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी आसनव्यवस्था, अद्यावत प्रसूतीगृह आदी सुविधा देण्यात येतील. याशिवाय टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट करण्यासाठीही सोय केली जाईल. आरोग्य सुविधा उंचावतीलसीईओ राजीव जवळेकर म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. सुविधांमध्ये सुधारणा करून ग्रामीण रुग्णांना अत्याधुनिक सोयी देण्याचा प्रयत्न आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये योजना सक्सेस झाली तर उपकेंद्रांमधूनही राबविता येईल, असेही त्यांनी सांगितले....तरच होेईल अंमलबजावणी जिल्ह्यात २९० उपकेंद्रे, ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे, १ जिल्हा रुग्णालय, ४ ग्रामीण रुग्णालये, १ महिला रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालये आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे, दांडीबहाद्दर अधिकारी- कर्मचारी यामुळे आरोग्य सुविधांची वाताहत आहे. अशा स्थितीत या योजनेची अंमलबजावणी महत्त्वाची आहे.अत्याधुनिक सुविधा येतील; पण वैद्यकीय अधिकारीच मुख्यालयी थांंबले नाही तर या सुविधांचा रुग्णांना कितपत फायदा होईल ही शंकाच आहे.या ‘पीएचसीं’ची निवड...कायापालटसाठी प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड केली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर साधारणत: दहा लाख रुपये खर्च केले जातील. तालुकानिहाय प्राथमिक केंद्रे अशी: बीड- चौसाळा, पाटोदा- नायगाव, केज- विडा, अंबाजोगाई- घाटनांदूर, परळी- सिरसाळा, गेवराई- तलवाडा, शिरूर- शिरूर, धारूर- भोगलगाव, आष्टी- कडा, वडवणी- कुप्पा, माजलगाव- टाकरवण.